KGF star yash reveals folks from his home town spreading weired stories after his success.once he did not bath for 5 days  Google
मनोरंजन

Tollywood: स्ट्रगल काळात चक्क 5 दिवस आंघोळीविना राहिला होता KGF चा रॉकी भाई.. कारण ऐकाल तर चक्रावेल डोकं..

केजीएफ नंतर यश सुपरस्टार पदावर आरुढ झालाय पण त्यानंतर प्रशंसा कमी आणि विचित्र गोष्टी त्याच्याविषयी पसरवल्या जातायत,असा खुलासा अभिनेत्यानं केलाय.

प्रणाली मोरे

Tollywood: केजीएफ चा रॉकी उर्फ यशला २०२२ मधील भारतातला सर्वात मोठा रॉकिंग स्टार म्हटलं तर नक्कीच चूकीचं ठरणार नाही. त्याच्या केजीएफ २ ने यावर्षात बॉक्सऑफिसवर तगडी कमाई करत अनेक रेकॉर्ड केले आहेत. तब्बल ८५० करोडची कमाई या सिनेमानं केली आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या केजीएफच्या पहिल्या भागानंतर यशला भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्याचं फॅन फॉलोइंग भारतातं जबरदस्त वाढत गेलं,त्यामुळे केजीएफ २ ला भरपूर यश मिळणार हे तर निश्चित होतं. आणि तसंच झालं..'केजीएफ २' हिट झाला.(KGF star yash reveals folks from his home town spreading weired stories after his success.once he did not bath for 5 days)

दुसऱ्या सिनेमानंतर फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर भारतातील सर्वात बड्या स्टार्सनीही यशला सर्वात तगडा स्पर्धक मानायला सुरुवात केली आहे. यशाच्या शिखरावर बसलेला यश खरंतर कर्नाटकच्या एका छोट्याशा गावातील अगदी साध्या कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील साधे ड्रायव्हर होते. यशनं आपल्या मेहनतीच्या बळावर बंगळुरू गाठलं आणि थिएटरमध्ये स्ट्रगल करायला सुरुवात केली होती. अशा अगदी साध्या कुटुंबातून आलेल्या यशचा इंडस्ट्रीतला खडतर प्रवास खूप चांगली शिकवण देणारा आहे.

जेव्हा कोणी यशस्वी होतं तेव्हा त्याला आधीपासून ओळखणारे लोकं खूप वेगळ्या पद्धतीनं रिअॅक्ट होतात. यशनं नुकतंच एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की त्याच्या शहरात त्याला आधीपासून ओळखणारे लोक त्याला यश मिळाल्यानंतर त्याच्यात आपला वाटा देखील शोधू लागले,त्यासाठी नवनवीन कहाण्या बनवू लागले.

यश त्याच मुलाखतीत पुढे म्हणाला की,''सगळ्यात जास्त तेव्हा वाईट वाटतं जेव्हा लोक मला म्हणतात,तू आता बदललायस. खरंतर वेळेनुसार,परिस्थितीनुसार बदलावं लागतं. पण हा बदल चांगल्यासाठी असावा हे मला चांगलं समजतं. तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा पण एक मात्र आहे तुम्ही ज्या ठिकाणचे आहात तिथे तुम्हाला कधीच सम्मान मिळत नाही. ते लोक विचार करतात की हा तर इथेच फिरायचा. कॉलेजमधले म्हणतात,अरे हा तर माझा क्लासमेट आहे. नाटक केले असेल कधी तुम्ही तर तिथले थिएटरचे लोक म्हणतात अरे मीच याला थिएटरमध्ये आणलं होतं''.

यश पुढे म्हणाला,''आजकाल तर मला अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत,ज्या ऐकल्यावर मी विचार करतो की हे मी कधी केलं होतं..लोक म्हणतात कधी कधी मला पाहिल्यावर,अरे याने कितीतरी दिवस उपाशी राहून दिवस काढलेयत..मीच याला जेवायला दिलं होतं. एकदा तर कोणीतरी माझ्या विषयी म्हटलं होतं की मी पाच दिवस आंघोळ नव्हती केली. पण मला ते सहनच झालं नाही. कोणीतरी एक क्लीप मला पाठवली होती. मग मी त्या व्यक्तीला कॉल करुन विचारलं, मित्रा, मी कधी पाच दिवस आंघोळ नव्हती केली? हे काय आहे? तुला माझ्या यशाचं क्रेडिट घ्यायचं आहे तर घे, काही हरकत नाही. पण हे सगळं चुकीचं पसरवू नकोस''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT