pani news photo 
मनोरंजन

'नदी रो रही थी तब कहा थे तुम,गुस्सा गुस्सा पाणी'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - जगभरात पाणी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी जगातील अनेक देश काम करीत आहेत. यंदाच्या वर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा दिला असला तरी दुसरीकडे अद्यापही काही जिल्हयांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध संस्था जनजागृतीपर आवाहन करत आहेत. जेणेकरुन पाण्यासारख्या ज्वलंत विषयाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रसिध्द गीतकार प्रसुन जोशी लिखित आणि जगप्रसिध्द संगीतकार ए आर रेहमान याने संगीत दिलेलं एक गाणं नुकतचं व्हायरल झाले आहे. त्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यात सहभागी झालेल्या लहान मुलांनी पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करा आणि सर्वांचे जीवन वाचवा हा संदेश प्रामुख्याने देण्यात आला आहे. पाणी हा विषयच असा आहे की, त्यात कुठलाही भेदभाव नाही. वैश्विक प्रश्न म्हणून पाण्याकडे पाहिले जाते. आजही आशिया, आफ्रिका, खंडातील काही देशांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

पाण्याअभावी जीव गमवावा लागणा-यांची संख्याही मोठी आहे. यात मुक्या प्राण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अशा अनेक मुद्दयांना प्रसुन जोशी यांनी सुरेख शब्दांत मांडले आहे. रेहमान यांच्या संगीतानं गाण्याची उंची आणखी वाढली आहे. त्यामुळे हे गाणे कमालीचे श्रवणीय झाले आहे. पाणी वाचविणे, त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पाण्याबरोबरच स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. याचा विचाप करणे गरजेचे आहे. म्हणून तर नदी जेव्हा रडत होती तेव्हा सगळे कुठे होते असा प्रश्न गीतकाराने विचारला आहे. नदी, नाले यांची अवस्था कशी केली आहे, यामुळे जे काही अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे त्याला कोण जबाबदार? याकडे गाण्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. 

समृध्द आयुष्य जगण्यासाठी पाण्याबरोबरच स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. आतापर्यत माणसाने त्याच्या स्वार्थासाठी जमीन, नदी यांचा वाट्टेल तसा वापर केला आहे. त्यांची दुरवस्था झाली आहे. हे त्याच्या लक्षात नाही. याकडे तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. म्हणून यासगळ्या परिस्थितीचा जाब पुढची पिढी विचारेल त्यावेळी त्याचे उत्तर कोण देणार, तेव्हा आतापासून जे काही दयनीय झाले आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.

स्वच्छतेबरोबर पाणी या प्रश्नाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. आतापर्यत पाणी अडवा आणि पाणी जिरवा असा संदेश देऊन पाण्याविषयक जनजागृती करण्यात आली आहे. मात्र त्याच्या जोडीला स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे हे कुणी सांगत नाही. अशावेळी लहानमुलांनी एकत्रित येऊन गायलेलं हे गाणं सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT