jaya bachchan 
मनोरंजन

अभिनेत्री जया बच्चन यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने केली वाढ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- खासदार जया बच्चन यांच्या एका विधानाने संसेदत गदारोळ माजला होता. जया बच्चन यांनी रवि किशन यांच्यावर निशाणा साधत बॉलीवूडची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर कंगना रनौत रवि किशन आणि भाजपा समर्थकांनी जया बच्चन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. सोशल मिडियावरही जया बच्चन यांना मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला. हा सगळा प्रकार पाहुन महाराष्ट्र सरकारने जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांचे दोन बंगले आहेत. जया बच्चन यांच्या विधानावर होत असलेला गदारोळ पाहता महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सरकारने या दोन्ही बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ही सुरक्षा सोशल मिडियावर दिल्या जाणा-या धमक्यांमुळे वाढवली आहे. सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की बच्चन कुटुंबाच्या वैयक्तिक सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. 

महाराष्ट्र सरकारने बच्च कुटुंबाची सुरक्षा वाढवल्यानंतर भाजपाकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भाजपाने म्हटलंय की, 'महाराष्ट्र सरकारने सुरक्षा वाढीची एवढी तत्परता सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत यांच्यासाठी का दाखवली नाही? त्यांनी पुढे म्हटलंय की सुशांतच्या कुटुंबाने फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या जिवाला धोका आहे असं सांगितलं होते तेव्हा सरकारने कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती. भाजपाने म्हटलंय की हे कृत्य उद्धव ठाकरे सरकारचा दुट्टपीपणा दर्शवतं.'

maharashtra govt beefs up the security for the bachchan family

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT