Manipur Violence Ashutosh Rana Tweet Viral social  esakal
मनोरंजन

Ashutosh Rana : 'इतिहास साक्षी आहे ज्यांनी महिलांना...' मणिपूर घटनेवरुन आशुतोष राणांचा प्रचंड संताप

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी खरमरीत शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ashutosh Rana, Manipur Violence Manipur News : मणिपूरच्या घटनेचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर वेगानं उमटत आहेत. देशभरातून त्या राज्यात होणाऱ्या गंभीर घटनांचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला जात आहे. आता तर बॉलीवूड सेलिब्रेटी देखील त्या घटनेवर परखडपणे व्यक्त होऊ लागले आहेत. आतापर्यत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, मीरा चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील परिस्थिती गंभीर होत आहे. त्या राज्यामध्ये आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील परिस्थिती आटोक्यात आणावी तसेच स्थानिक प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं जे गैरप्रकार आणि हिंसाचार सुरु आहे तो नियंत्रणात आणावा. अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे. दरम्यान मनोरंजन, समाजकारण क्षेत्रातील काही मान्यवरांनी त्या घटनेवर दिलेल्या प्रतिक्रियेनं नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी खरमरीत शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणतात, मणिपूरमध्ये जे झाले ती संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आपण अजूनही एक समाज म्हणून कशाप्रकारे जगतो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. इतिहास साक्षी आहे की, ज्या ज्या वेळी महिलांचे शोषण करण्यात आले त्याची मोठी किंमत बाकीच्यांना चुकवावी लागली आहे. जे काही होतं आहे त्याचे आपल्याला काहीच का वाटत नाही. असा प्रश्न राणा यांनी उपस्थित केला आहे.

मणिपूरमध्ये काही महिलांच्या सोबत अमानुष कृत्य करण्यात आले.त्याचे तीव्र पडसाद आता देशभर उमटले आहेत. त्यामुळेच की काय सोशल मीडियावर त्या घटनेचा अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे चार अंग आहेत. तसेच लोकशाहीचे देखील विधायक, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे चार स्तंभ आहेत. या प्रत्येकानं आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्याची गरज आहे. असे राणा यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीच्या चार स्तंभांनी मिळून काम करायला हवे. आता ती वेळ आली आहे. तसे झाल्यास जे काही चूकीचे होते आहे त्या गोष्टी थांबवता येतील. राणा यांच्यापूर्वी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेत्री मीरा चोप्रा, उर्फी जावेद यांनी देखील मणिपूर घटनेवरुन तीव्र शब्दांत आपला निषेध नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT