मनोरंजन

'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात.

सकाळ डिजिटल टीम

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. ते जसे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत तसे ते ठाम भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी एका कार्यक्रमातून सध्याच्या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करताना राजकीय परिस्थितीकडेही लक्ष वेधले आहे. आता गोखले यांचे ते वक्तव्य चर्चेत आले आहे. याशिवाय त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा संप, त्यांचे आंदोलन यावरुन प्रशासनाला धारेवर धरले आहे.

गोखले म्हणाले, राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का?या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो त्यात लाल बहादूर शास्त्री सोडून. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.

किती वर्षे कारस्थान आहे?

हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. शिवसेना आणि भाजप या पक्षांविषयी गोखले म्हणाले की, शिवसेना आणि भाजप एकत्र यायला हवे. ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचा असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू मुस्लिम, ब्राह्मण दलित यांत वाद होतील. शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे. याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलंय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी देखील गोखले यांनी टीका केली. ते म्हणाले, एसटी महामंडळाचा मी ब्रँड अँबेसिडर होतो. एअर इंडिया आण एसटीला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केले. कंगनाच्या वक्तव्यावर ते म्हणाले, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजप आघाडीबाबत पुढाकार घाययला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप...; कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट!

Konkan Railway: मुंबईहून सावंतवाडीला सुटणार विशेष गाड्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

Manchar News : मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची आंबेगाव तालुक्यात जय्यत तयारी; तीन हजार समाज बांधव मुंबईत जाणार

Asia Cup 2025: Inshallah! भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत धुळ चारू; IND vs PAK मॅचपूर्वी हॅरिस रौफचा फाजील आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT