rutuja deshmukh complaint to cm eknath shinde and nitin gadkari for pay extra toll in mumbai pune highway marathi actress SAKAL
मनोरंजन

Rutuja Deshmukh: असा टोल कापणे योग्य आहे? मराठी अभिनेत्रीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरींकडे तक्रार

मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केलीय

Devendra Jadhav

Rutuja Deshmukh News: टोलनाक्यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अडवल्याने मनसैनिकांनी टोलनाका फोडला होता.

आता मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने व्हिडीओ शेअर करत तक्रार केलीय. काय म्हणाली ऋतुजा बघुया..

(rutuja deshmukh complaint to cm eknath shinde and nitin gadkari for pay extra toll in mumbai pune highway)

 ऋतुजा पुण्याला प्रवासाला निघाली अन्...

३१ जुलैला ऋतुजा,मुलगी आणि नवऱ्यासोबत पुण्याला निघाली. ऋतुजाचं कुटुंब पुण्याला जाताना वाटेत लोणावळ्याला नेहमी थांबतात. त्या ठिकाणी खुपदा नेटवर्क नसतं. त्यामुळे तिथुन निघाल्यावर टोलचे मेसेज किंवा मेल्स मोबाइलवर उशिरा येतात.

मुंबई - पुणे प्रवासात टोलनाक्याचे दोन टप्पे

ऋजुताने शेअर केलेल्या व्हिडीओत पुढे कळुन येतं की.. सामान्यपणे मुंबई-पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर २४० रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर ८० रुपये टोल घेतला जातो. ऋतुजा पुण्याला घरी पोहोचल्यावर तिच्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता. त्यामध्ये खालापूरला २४० आणि तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये असे एकुण ४८० रुपये टोल कापला गेला होता.

ऋजुताने रितसर तक्रार केली पण, अजून तिला कोणाकडूनही उत्तर मिळालेले नाही. दुसऱ्या दिवशी ऋतुजा पुन्हा मुंबईला यायला निघाली तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून तिने तेथील मॅनेजरची भेट घेतली.

तेव्हा मॅनेजर ऋतुजाला म्हणाला, “मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापला गेलाय. आता मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० असे टोलचे दोन टप्पे जेव्हापासून फास्ट टॅग लागु झाला तेव्हापासून सुरु झाले, असं मॅनेजर म्हणाले.”

अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का?

ऋतुजा या व्हिडीओत शेवटी म्हणाली, मुंबई ते लोणावळा ८३ किमी अंतर आहे तर, लोणावळा ते पुणे ६४ किमी. फक्त लोणावळ्याला थांबले म्हणुन ऋतुजाकडून दुप्पट टोल आकारण्यात आला असा सवाल तिने विचारलाय. अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? असं ऋतुजा म्हणाली.

ऋतुजाने या व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहीले.. तुम्हाला काय वाटते? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आले, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?” असा प्रश्न अभिनेत्री ऋजुता देशमुखने या व्हिडीओमार्फत उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT