Salman Khan's Kabhi Eid Kabhi Diwali title changed
Salman Khan's Kabhi Eid Kabhi Diwali title changed  Google
मनोरंजन

'कभी ईद,कभी दिवाली' टायटल बदललं; सलमानने हा निर्णय घेतला कारण...

प्रणाली मोरे

सलमान खानच्या(Salman Khan) 'कभी ईद,कभी दिवाली'(Kabhi Eid,Kabhi Diwali) सिनेमाच्या 'बदल' हा शब्द म्हणे पाचवीला पूजला आहे. आता बघा नं जेव्हा पासून सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून रोजच सिनेमात जुनं काढून नव्यानं रोज काहीतरी बदल करण्यात येतोय. कलाकारांच्या बाबतीतही तेच झालं होतं की. आतापर्यंत रोज या सिनेमातील कलाकारांची नवीन लिस्ट समोर येत होती. आता इंग्रजी वृत्तपत्राला मिळालेल्या बातमीनुसार खुलासा होत आहे की सिनेमाचं टायटल म्हणजे 'कभी ईद,कभी दिवाली' हे नावच बदलण्यात आलं आहे. मग काय असेल सिनेमाचं नवीन नाव? आणि अचानक का बदललं सिनेमाचं नाव. चला जाणून घेऊया सविस्तर.

सलमानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं म्हणे सुरुवातील 'भाईजान' हे नाव होतं. आता निर्णय झालाय की या जुन्या नावानेच सिनेमा करायचा. सलमान खानच्या जवळच्या सूत्रांनी ही नवीन ब्रेकिंग दिलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं नाव 'भाईजान' असंच खरंतर होतं. पण काही महिन्यांपूर्वी सिनेमाचं टायटल अचानक बदलून 'कभी ईद,कभी दिवाली' असं करण्यात आलं. नव्हे तसं रीतसर घोषित केलं गेलं. पण आता प्रमुख निर्माता म्हणून सिनेमा साजिद नाडियादवालाकडून सलमान खान कडे गेल्यावर सिनेमाच्या बाबतीत खूप मोठे बदल करण्याचे काही निर्णय खूप पटकन घेतले गेले आहेत असं दिसून आलं.

या सिनेमाचं काम आधी साजिद नाडियादवाला प्रमुख निर्माता म्हणून पाहणार होता,आणि सलमान सह-निर्माता होता. पण आता सिनेमाची मुख्य सूत्र सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसकडे गेल्यानं अनेक बदल केले जात आहेत. आणि त्यातूनच सिनेमाचं टायटल बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सिनेमा सलमानकडे गेल्यानंतर जसी गिल,सिद्धार्थ निगमच्या जागी सिनेमात आयुष शर्मा म्हणजे सलमानच्या बहिणीचा नवरा आणि जाहिर इकबाल यांना रिप्लेस केलं गेलं. आता राघव जुएल आणि मालविका शर्मा देखील सिनेमाचा भाग असणार आहेत अशी बातमी आहे. पूजा हेगडे आणि व्यंकटेशही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्याच वर्षाच्या शेवटी शेवटी सलमाननं 'बजरंगी भाईजान'चा सीक्वेल येण्याची घोषणा केली होती. आता 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं टायटल 'भाईजान' ठेवलंय त्यामुळे चाहते भाईजानच्या सीक्वेलचं (सारखं नाव असल्यामुळे)कसं स्वागत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सलमान सध्या चर्चेत आहे ते त्याला एका अज्ञात ईसमानं पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे. कालच ६ जून,२०२२ रोजी या प्रकरणासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर सलमान खान हैदराबादला २५ दिवसांसाचं शूटिंग शेड्यूल पूर्ण करण्यासाठी रवाना झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT