Salman Khan's Kabhi Eid Kabhi Diwali title changed  Google
मनोरंजन

'कभी ईद,कभी दिवाली' टायटल बदललं; सलमानने हा निर्णय घेतला कारण...

सलमान खानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमा घोषित झाल्यापासून प्रत्येक दिवशी यात नवीन बदल केले जात आहेत.

प्रणाली मोरे

सलमान खानच्या(Salman Khan) 'कभी ईद,कभी दिवाली'(Kabhi Eid,Kabhi Diwali) सिनेमाच्या 'बदल' हा शब्द म्हणे पाचवीला पूजला आहे. आता बघा नं जेव्हा पासून सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून रोजच सिनेमात जुनं काढून नव्यानं रोज काहीतरी बदल करण्यात येतोय. कलाकारांच्या बाबतीतही तेच झालं होतं की. आतापर्यंत रोज या सिनेमातील कलाकारांची नवीन लिस्ट समोर येत होती. आता इंग्रजी वृत्तपत्राला मिळालेल्या बातमीनुसार खुलासा होत आहे की सिनेमाचं टायटल म्हणजे 'कभी ईद,कभी दिवाली' हे नावच बदलण्यात आलं आहे. मग काय असेल सिनेमाचं नवीन नाव? आणि अचानक का बदललं सिनेमाचं नाव. चला जाणून घेऊया सविस्तर.

सलमानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं म्हणे सुरुवातील 'भाईजान' हे नाव होतं. आता निर्णय झालाय की या जुन्या नावानेच सिनेमा करायचा. सलमान खानच्या जवळच्या सूत्रांनी ही नवीन ब्रेकिंग दिलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं नाव 'भाईजान' असंच खरंतर होतं. पण काही महिन्यांपूर्वी सिनेमाचं टायटल अचानक बदलून 'कभी ईद,कभी दिवाली' असं करण्यात आलं. नव्हे तसं रीतसर घोषित केलं गेलं. पण आता प्रमुख निर्माता म्हणून सिनेमा साजिद नाडियादवालाकडून सलमान खान कडे गेल्यावर सिनेमाच्या बाबतीत खूप मोठे बदल करण्याचे काही निर्णय खूप पटकन घेतले गेले आहेत असं दिसून आलं.

या सिनेमाचं काम आधी साजिद नाडियादवाला प्रमुख निर्माता म्हणून पाहणार होता,आणि सलमान सह-निर्माता होता. पण आता सिनेमाची मुख्य सूत्र सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसकडे गेल्यानं अनेक बदल केले जात आहेत. आणि त्यातूनच सिनेमाचं टायटल बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सिनेमा सलमानकडे गेल्यानंतर जसी गिल,सिद्धार्थ निगमच्या जागी सिनेमात आयुष शर्मा म्हणजे सलमानच्या बहिणीचा नवरा आणि जाहिर इकबाल यांना रिप्लेस केलं गेलं. आता राघव जुएल आणि मालविका शर्मा देखील सिनेमाचा भाग असणार आहेत अशी बातमी आहे. पूजा हेगडे आणि व्यंकटेशही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्याच वर्षाच्या शेवटी शेवटी सलमाननं 'बजरंगी भाईजान'चा सीक्वेल येण्याची घोषणा केली होती. आता 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं टायटल 'भाईजान' ठेवलंय त्यामुळे चाहते भाईजानच्या सीक्वेलचं (सारखं नाव असल्यामुळे)कसं स्वागत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सलमान सध्या चर्चेत आहे ते त्याला एका अज्ञात ईसमानं पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे. कालच ६ जून,२०२२ रोजी या प्रकरणासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर सलमान खान हैदराबादला २५ दिवसांसाचं शूटिंग शेड्यूल पूर्ण करण्यासाठी रवाना झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT