Salman Khan's 'SHOCKING' reaction to Aishwarya Rai, Abhishek Bachchan's marriage will surprise you Google
मनोरंजन

Aishwarya-अभिषेकचं लग्न, सलमानच्या प्रतिक्रियेनं सर्वांची बोलती झालेली बंद

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्या-सलमानचं प्रेम प्रकरण आणि ब्रेकअप भलतंच गाजलं होतं.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचं पावरफुल कपल विषयी बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय-बच्चन(Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल. दोघांचे लग्न २० एप्रिल,२००७ रोजी झाले होते. याआधी ऐश्वर्या राय बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची 'लेडी लव' होती. तर अभिषेक आणि करिष्मा कपूर यांचे लग्न होणार होते. परंतु,२००३ मध्ये काही कौटुंबिक मतभेदांमुळे करिष्मा-अभिषेकचा साखरपुडा तुटला. सगळ्यांना माहित आहे की बॉलीवूडची अधूरी प्रेम कहाणी कोणती तर ती सलमान-ऐश्वर्याची. (Salman Khan's 'SHOCKING' reaction to Aishwarya Rai, Abhishek Bachchan's marriage will surprise you)

एक वेळ होती जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. पण एक दिवस असा आला की ज्या दिवशी या दोघांमधला वाद रस्त्यावर आला. ऐश्वर्यानं दबंग खानवर गंभीर आरोप लावले. चला आज थोडं सलमानच्या त्या खास उत्तराविषयी जाणून घेऊया जेव्हा अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नानंतर भाईजानने त्याचं मन किती मोठं आहे हे दाखवून दिलं होतं.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक मोठा रोमॅंटिक सिनेमा घेऊन येत होते. या सिनेमासाठी त्यांनी सलमान,ऐश्वर्याला मु्ख्य भूमिकेसाठी निवडलं तर अजय देवगणही त्या सिनेमाचा महत्वाचा भाग होता. या सिनेमाचं नाव होते 'हम दिल दे चुके सनम'. सिनेमाचं शूटिंग सुरू झालं.आणि बघता बघता ऐश आणि सलमान प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोघांच्या 'हम दिल दे चुके सनम' सिनेमानं पडद्यावर कमाल केली,दोघांची जोडी रिल लाइफमध्ये सुपरहिट ठरली. पण त्यानंतर मात्र हळूहळू त्याच्या पर्सनल लाइफमध्ये कडवटपणा येऊ लागला.

आता सलमान ऐश्वर्याच्या नात्याविषयी लोक अनेक तोंडी, बऱ्याच गोष्टी बोलले. पण सगळ्यात मोठा दावा केला गेला की सलमान-ऐश्वर्या ३ वर्षासाठी रिलेशनशीपमध्ये होते आणि २००२ मध्ये ते वेगळे झाले. दोघांच्या आयुष्यात तेव्हा वादळ आलं जेव्हा ऐश्वर्यानं सलमानवर आरोप केला,तिला मारण्याचा. हा तोच काळ होता जेव्हा सलमानच्या इमेजवर घमेंडी आणि आगाऊ असा शिक्का पडला होता. आता सलमानने नेहमीच या आरोपांचे खंडन केलं आणि यात काहीच दम नसल्याचं सांगितलं.

एकदा सलमानने त्याच्या स्वभावाविषयी पसरलेल्या अफवांवर आणि ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर चुप्पी तोडत मोकळेपणाने संवाद साधला होता. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता, ''मला मनापासून वाटतं की तिनं तिच्या आयुष्यात खूप खुश रहावं. आणि दबंग खानची हिच गोष्ट त्याच्या चाहत्यांच्या मनाला भावली होती''.

आता ऐश्वर्या आणि सलमान दोघंही आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. सलमानने आजही लग्न केलं नाही तर ऐश्वर्या बॉलीवूडच्या मोठ्या कुटुंबाची म्हणजे बच्चन कुटुंबाची सूनबाई झाली आहे. तिला एक दहा वर्षांची मुलगी आहे,जिचं नाव आराध्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT