Sameer Vidwans Tweet On Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement On mumbai Google
मनोरंजन

'मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर...' समीर विद्वांसचा घणाघात..

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांना बाहेर काढलं तर मुंबईत काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं.

प्रणाली मोरे

Mumbai मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांना बाहेर काढलं तर मुंबई,ठाण्यात,आजुबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. पण त्यानंतर मात्र राजकीय गोटातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी देखील जोर धरून आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे. या दरम्यान आता मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यानं देखील राज्यापालांच्या बेताल वक्तव्यावर ट्वीट करत त्यांच्याविरोधात सूर काढला आहे.(Sameer Vidwans Tweet On Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement On mumbai)

समीर विद्वांस नेहमीच सामाजिक,राजकीय विषयांवर बोलताना दिसतो. तो आपली भूमिका अगदी स्पष्ट भाषेत मांडत असतो. आता देखील त्यानं राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ट्वीट करत म्हटलं आहे,''कधी सावित्रीमाईंबद्दल बेताल वक्तव्य करायचं तर कधी मराठी माणसाला हिणवायचं! का?! कशासाठी? मुंबई सगळ्यांना सामावून घेते, भेदभाव करत नाही त्या मुंबईचा आणि मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर काय बोलायचं?!''

दुर्दैव दुसरं काय!

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'आनंदी गोपाळ'चा दिग्दर्शक समीर नेहमीच आपल्या सिनेमांच्या माध्यमातूनही सामाजिक विषयांवर भूमिका मांडताना दिसतो. राज्यपालांच्या वक्तव्यावर त्यानं केलेलं ट्वीट देखील चर्चेत आलं आहे. लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT