The Kerala Story Movie Kedar Shinde tweet viral esakal
मनोरंजन

The Kerala Story : 'केरळ स्टोरीचा एवढा राग का?...' नेटकऱ्यांचा केदार शिंदेंना प्रश्न!

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Movie Kedar Shinde tweet viral related : प्रसिद्ध चित्रपट, नाट्य दिग्दर्शक केदार शिंदें हे त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृतींसाठी ओळखले जातात. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांच्या चित्रपट, नाटकांनी मराठी मनांवर अधिराज्य केले आहे. सध्या त्यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातच त्यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय झाला आहे.

पाच मे रोजी द केरळ स्टोरी नावाचा चित्रपट झाला आणि देशभरामध्ये एका वेगळ्याच वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. इसिस, हिंदू - मुस्लिम संघर्ष, लव जिहाद सारख्या मुद्द्यांकडे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी लक्ष वेधले आहे. विपुल अमृतलाल शहा यांनी या चित्रटाची निर्मिती केली आहे. तीन दिवसांपात या चित्रपटानं देशभरातून पन्नास कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट होताना दिसतो आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासगळयात दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यांनी ट्विट करत, द केरळ स्टोरीचा फटका आपल्या चित्रपटाला कसा बसला आहे. आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेप कसा होतो आहे, चित्रपट आणि राजकीय भूमिका याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?

शिंदे यांच्या त्या ट्विटवर त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्या आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे तर काहींनी त्यांना सुनावलेही आहे. तुम्ही केरळ स्टोरी आणि महाराष्ट्र शाहीर यांची तुलना करु नका. दोन्ही वेगळे चित्रपट आहेत. लोकांना त्या विषयाचे गांभीर्य जास्त वाटत असल्यानं ते तो चित्रपट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. कदाचित आणखी काही दिवसांनी तुमच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं प्रदर्शित झाला. त्याचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून त्यात अंकुश चौधरी, सना शिंदे, मृण्मयी देशपांडे, अतुल काळे, निर्मिती सावंत, अश्विनी महांगडे, अमित डोलावत यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT