Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs Google
मनोरंजन

निधनानंतर सावन कुमार टाक चर्चेत,एक्स-वाईफचा दिग्दर्शकाच्या विवाहबाह्य संबधांवर खुलासा

सावन कुमार टाक यांच्याशी लग्न केल्यानंतर संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना ७ वर्षांतच त्यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.

प्रणाली मोरे

Sawan Kumar Tak: निर्माते सावन कुमार टाक (Sawan Kumar Tak) यांचे २५ ऑगस्ट,2022 रोजी निधन झाले होते. त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी उषा खन्ना यांनी त्यावेळी बोलणं टाळलं होतं. त्या एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शिका राहिल्या आहेत. जगासमोर सावन कुमार टाक आणि आपल्या नात्याविषयी बोलणं त्यांना तेव्हा योग्य वाटलं नव्हतं. पण आता अनेकांना माहीत नसलेले काही खुलासे उषा खन्ना यांनी केले आहेत. सावन कुमार टाक यांच्या निधनानंतर काही दिवसांनी उषा खन्ना यांनी आपली लव्ह स्टोरी आणि तुटलेलं नातं यावर मोकळेपणानं बोलणं पसंत केलं.(Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs)

एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना उषा खन्ना म्हणाल्या,''मी एका सिनेमाचं संगीत करत होते. त्यावेळी सावन कुमार तिथे आले होते. ते त्या सिनेमासाठी गाणं लिहित होते. आमच्यात कामामुळे चांगलं बॉन्ड बनलं. त्यांनी लगेचच त्यांचा आगामी सिनेमा 'हवस' साठी मला संगीतकार म्हणून साइन केलं. त्यादरम्यान आमच्यात मैत्री झाली आणि तिचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर आम्ही लग्न केलं पण आम्हा दोघांची कुटुंबं त्या लग्नाला हजर नव्हती''.

लग्नाच्या ७ वर्षानंतर आपलं लग्न का तुटलं हे सांगताना उषा खन्ना म्हणाल्या,''काही वर्ष संसार केल्यानंतर आपण ज्या व्यक्तीसोबत राहत आहोत त्याच्या काही गोष्टी तुम्हाला खटकू लागतात. सारखं भांडण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं असं वाटू लागतं. मी ज्याच्यावर प्रेम करायचे अशा व्यक्तीविषयी मी वाईट कसं बोलू. पण आम्ही एकत्र नाही राहू शकलो. आमच्यात वैचारिक मतभेद होते. आम्ही निर्णय घेतला,तु तुझ्या जागी योग्य, मी माझ्या जागी योग्य, मित्र बनून राहू पण यापुढे पती-पत्नी म्हणून नको. आज मला माझ्या मित्राची खूप आठवण येते. जे नातं मित्र म्हणूनआमच्यात पक्क होतं,ते लग्नानंतर नवरा-बायको म्हणून नाही होऊ शकलं''.

'सावन कुमार यांच्या खूप मैत्रिणी होत्या,त्यांचे विवाहबाह्य संबंध होते का?' या थेट प्रश्नावर उषा म्हणाल्या,''हो,होते. ते मला कळल्यावर मीच म्हटलं,वेगळं होऊया आणि यापुढे मी तुम्हाला कशाविषयीच काही विचारणार नाही. खूप वाईट वाटायचं तेव्हा. कारण मी सुद्धा एक माणूस होते, पत्नी होते. फक्त मी म्हटलं, तु तुझ्या जागी,मी माझ्या जागी राहणं योग्य,आणि वेगळे झाले कारण मला त्यांच्याशी भांडत संसार नव्हता करायचा''.

'विवाहबाह्य संबंध हेच एक कारण लग्न तुटण्याचं होतं का?' यावर उषा खन्ना म्हणाल्या ,''त्यांच्या खूप गर्लफ्रेंड्स होत्या. आणि त्यांचे सावन कुमार यांच्या आयुष्यात खास स्थान होते. त्या खूप महत्त्वाच्या होत्या सावन कुमार यांच्यासाठी. मग मी हे कसं सहन करत बसले असते? शेवटी नाती काचेसारखी असतात. आमच्यात दुरावा येऊ लागला होता. पण मी या सगळ्यामुळे रडत बसायचं नाही ठरवलं आणि लग्नाचं बंधन तोडून टाकलं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT