मराठवाडा

महापालिकेकडून16 लाख लिटर पाण्याचे रिसायक्लिंग

हरी तुगावकर

लातूर : लातूर शहराला सातत्याने दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर होणे आवश्यक आहे. एकीकडे टंचाई असताना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्रावर दररोज 16 लाख लिटर पाणी वाया जात होते. आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यामुळे या पाण्याचा आता फेरवापर केला जात आहे. नाल्यात जाणारे हे पाणी आता शेततळ्यात घेवून त्याचे रिसायक्लिंग करून त्याचा फेरवापर केला जात आहे.  

50 एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण

लातूर शहराला दररोज 50 दशलक्षलिटर (एमएलडी) पाणी लागते. हे पाणी मांजरा धरणातून येते. हे पाणी हरंगुळ येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात घेवून त्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा केला जातो.

16 लाख लिटर पाणी वाया

या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज सहा फिल्टर बेड धुतले जातात. एका फिल्टर बेड धुण्यासाठी दोन लाख लिटर पाण्याचा वापर केला जातो. यातून बारा लाख लिटर पाण्याचा वापर केला जातो. तसेच मोठे दोन टँक धुण्यासाठी चार लाख लिटर पाण्याचा वापर केला जातो. म्हणजेच दररोज 16 लाख लिटर पाण्याचा या करीता वापर केला जात आहे.

नाल्यात जाणारे पाणी शेततळ्यात

वर्षानुवर्षे वॉटर बेड धुतलेले हे 16 लाख लिटर पाणी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्यात सोडून दिले जात होते. नाल्यतून ते पुढे वाहून जायचे. हे लक्षात आल्यानंतर आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात शेततळे करण्याची सूचना केली. नाल्या जाणारे हे पाणी या शेततळ्यात घेतले जावू लागले आहे. त्यामुळे दररोज हे शेततळे भरत आहे.

वाया जाणारे पाण्याचा फेरवापर

दररोज शेततळ्यात जमा होणारे पाणी 7.5 एचपीच्या दोन विद्युत मोटारीच्या सहाय्याने पुन्हा जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जात आहे. त्याचे शुद्धीकरण करुन पुन्हा त्याचा वापर केला जात आहे. या पाण्यामुळे टंचाईच्या काळात काहीसा दिलासा मिळत आहे. दररोज एका भागाला इतके पाणी उपलब्ध होवू शकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT