Water Tanker
Water Tanker 
मराठवाडा

महिनाभरात घटले २१९ टॅंकर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर जिल्ह्यात महिनाभरात कमीअधिक प्रमाणात झालेल्या पावसाने ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी टॅंकरमागे होणारी धावाधाव कमी केली आहे. जूनअखेरपर्यंत टॅंकरची संख्या कमी झाल्याने टंचाई नियोजन कार्यक्रमाला मुदतवाढ घेण्याची आवश्‍यकता भासणार नसल्याचे सूत्रांनी मत व्यक्‍त केले. महिनाभरात जिल्ह्यात २१९ पाण्याचे टॅंकर कमी झाले आहेत.

गेल्या हंगामात पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्र टंचाईला जिल्ह्याला सामोरे जावे लागले त्या पार्श्‍वभूमीवर पाणीटंचाईची आराखड्यानुसार जूनअखेरपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १६ लाख ६५ हजार ४६२ लोकसंख्येच्या ७७६ गावे आणि २९६ वाड्यांमध्ये एक हजार ११६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा पावसाला सुरवात झाल्यापासून काही मंडळांत अतिवृष्टी, तर काही भागांत साधारण पाऊस झाला. यामुळे बंधाऱ्यांत पाणी आले. काही सिमेंट बंधारेही भरले. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत बऱ्यापैकी पाझरू लागल्याने काही गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्रता कमी झाली. यामुळे २१९ टॅंकर कमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT