मराठवाडा

मराठवाड्यात 316 टॅंकरने पाणी 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मराठवाड्यात उष्णतेचा पारा जसजसा वाढतोय तसतशी टंचाईची झळही अधिक तीव्र होत चालली आहे. जवळपास 24 तालुक्‍यांत पाणीटंचाईने डोके वर काढले असून, औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईची झळ अधिक तीव्र आहे. गत आठवड्याच्या तुलनेत जालना, नांदेड, परभणी व हिंगोली आदी जिल्ह्यातही टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून, पाच जिल्ह्यांतील पाणीपुरवठ्यासाठीच्या टॅंकरची संख्या 316 वर पोचली आहे. टंचाई निवारण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील 595 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

सद्यःस्थितीत टंचाईची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसते आहे. जिल्ह्यातील 190 गावे व 13 वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्यांची बिकट बनलेली अवस्थाही टंचाईत वाढ करण्यास कारणीभूत ठरते आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या पाचही जिल्ह्यांतील 236 गाव व 17 वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामध्ये एप्रिलच्या सुरवातीलाच 27 गाव वाड्यांची भर पडली आहे. 

टंचाईग्रस्त...  - 24  तालुके 
263  - गावे 
595  - विहिरींचे अधिग्रहण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT