money 
मराठवाडा

अतिवृष्टीच्या निधी वाटपामुळे ७७ गावांमध्ये समाधान

विठ्ठल चंदनकर

बिलोली ः ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने दिलासा मिळाला असून बिलोली तालुक्यातील ९२ पैकी ७७ गावांतील शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत २० कोटी ३१ लक्ष ७९ हजार ८५३ रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्याचे वाटपही सुरू झाल्याची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. दरम्यानच्या काळात अस्मानी संकट ओढावले गेले. निवडणुकीपूर्वीपासूनच राज्यभरामध्ये सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतपिके व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. निवडणुकीनंतर लवकर सत्ता स्थापन न झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला होता. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये मदत मिळायला पाहिजे, अशी वल्गना करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. परिणामी लवकर सरकार स्थापन होऊ शकले नाही. राज्यपालांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली.

९२ गावांतील शेतकऱ्यांना फायदा  
शासनाच्या जुन्या अध्यादेशानुसार बिलोली तालुक्यातील ९२ गावांतील ३२ हजार ८२६ हेक्टर नुकसानीच्या क्षेत्रासाठी प्रतिहेक्‍टरी सहा हजार आठशे रुपयांप्रमाणे २२ कोटी ३२ लाख सोळा हजार आठशे रुपयांची मागणी करण्यात आली होती. राज्यपालांनी प्रतिहेक्‍टरी आठ हजार रुपये नुकसान जाहीर केल्यामुळे या आकड्यात वाढ झाली आहे. पहिल्या टप्प्यात वीस गावांसाठी सहा कोटी ३७ लक्ष ८९ हजार ३६४ रुपये निधी उपलब्ध झाला होता. नंतर दुसऱ्या टप्प्यात ५७ गावांतील नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी १३ कोटी ९३ लक्ष ९० हजार ४९९ रुपये निधी प्राप्त झाला आहे. दोन टप्प्यांत ९२ पैकी ७७ गावांसाठी २० कोटी ३१ लक्ष ७९ हजार ८५३ रुपये निधी उपलब्ध झाला असून तालुक्यातील सर्व बँकांच्या शाखेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सदर निधी वर्गही करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजपुत यांनी दिली.

१५ गावांसाठी निधी मागविला
तालुक्यातील १५ गावांसाठी कमी पडत असलेला निधी शासनाकडून मागविण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध होताच उर्वरित सर्व शेतकऱ्यांना त्याचा तत्काळ लाभ दिल्या जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. शासनाकडून उपलब्ध झालेल्या अर्थसहाय्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तूर, हरभरा संकटात
मागील चार-पाच दिवसांपासून तालुक्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि तूर पिकावर अळीचा वाढला असून दोन्ही पिके धोक्यात आली आहेत. हरभऱ्यावरील अळ्यांचा नायनाट करण्यासाठी फवरणी करण्यावर भर देण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : मंत्री माणिकराव कोकाटेंवरील अटकेची टांगती तलवार कायम; उच्च न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT