doctar.jpg
doctar.jpg 
मराठवाडा

विरोधकांना `त्या` पाच जणींनी दिले कृतीतून उत्तर

हरी तुगावकर

लातूर : सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तावर उपचार करणाऱय़ासाठी गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच डॉक्टर मुलींना पहिल्यापासूनच बोलणी खावी लागली. सोलापूरला गेल्यानंतर तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी पाठवले? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तेथून पुढे सांगली कोल्हापूरला गेल्यानंतर तेथेही तुम्ही कशाला आला असेच प्रश्न विचारून विरोध करण्यात आला. पुरुषी मानसिकतेचा विरोध झुगारून या पाचही डॉक्टर मुलींनी रात्रं दिवस पूरग्रस्तांवर उपचार केले नव्हे तर त्यांना मानसिक आधार देत या धक्क्यातून बाहेर काढले.

दरम्यान, पूरग्रस्तांवर उपचारासाठी राज्यातून गेलेल्या पाचशे डॉक्टरमध्ये फक्त या पाच डॉक्टर मुली होत्या. उपचार करून परतीच्या प्रवासात सर्वात उशिरा पोचणाऱय़ाही या पैकी तीन मुलीच होत्या. पुरुष डॉक्टरपेक्षा जास्त काम या मुलींनी केले आहे. सांगली आणि कोल्हापूर भागात महापूर आला. शेकडो गावे उद्धवस्त झाली. लाखो संसार उघड्यावर आली. महापूरामुळे तेथील नागरीकाच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.

राज्यभरातून शासकीय डॉक्टरांची अनेक पथके तेथे गेली होती. त्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वीस जणांचे एक पथक प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे व उपअधिष्ठाता डॉ. आनंद ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेले होते. या पथकाचे नेतृत्व डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले. यात पाच डॉक्टर मुलीचा समावेश होता. त्यात डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा कठारे, डॉ. पूजा पाटील, डॉ. नाझनीन डांगे, डॉ. लक्ष्मीप्रिया एन. एस. यांचा समावेश होता.

या सर्व डॉक्टर असलेल्या सर्व मुली स्वच्छेने पूरग्रस्त भागात गेल्या होत्या. हे पथक पहिल्यांदा सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले. तेथूनच या मुलींना विरोध सुरु झाला. हा पहिला टप्पा पार केल्यानंतर हे पथक सांगली, कोल्हापूरला गेले. तेथेही तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी पाठवले, तुम्ही परत जा असे त्यांना ऐकावे लागले. शासकीय स्तरावर त्यांना पुरुषी मानसिकतेचा सामना करावा लागला. या सर्व प्रकाराला न जुमानता या पाचही डॉक्टर मुली पूरग्रस्तांची सेवा करण्याच्या भावनेतून तेथेच थांबल्या.

ज्या गावात कोणी पोचले नव्हते, अशा ठिकाणी जावून त्यांनी पूरग्रस्तांची उपचार करून सेवा केली. इतकेच नव्हे तर मानसिक आधार देत पूरग्रस्तांना या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यभरातून सुमारे पाचशे डॉक्टर पूरग्रस्त भागात आली होती. त्यात फक्त पाच या डॉक्टर मुली होत्या. इतर सर्व पुरुष डॉक्टर होते. टप्प्या टप्प्याने ही पथके तेथून परतू लागली आहेत. लातूरचे पथक देखील परत आले आहे. यात पहिल्यांदा पुरूष डॉक्टरच परत आले. या पाच पैकी तीन मुली सर्वात उशिरा येथे आल्या. पुरुष डॉक्टर पेक्षा जास्त दिवस राहून त्यांनी काम करून त्यांना विरोध करणाऱय़ांना कृतीतून उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT