file photo 
मराठवाडा

रेल्वे पटरीने पायी आग्य्राकडे निघालेल्या चौदा जणांना सेलूत थांबविले

सकाळ वृत्तसेवा

वालूर (जि.परभणी) :  कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लाॅकडाउन’ असताना परभणी शहरातून  बुधवारी (ता.एक) सकाळी आग्य्राकडे रेल्वे पटरीने पायी निघालेल्या १४ जणांना पोलिसांनी सेलू (जि.परभणी) येथे थांबविले. 
जगभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परभणीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या नेतृवाखाली प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात घरोघरी तपासणी सुरू करण्यात आली आहे. बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांची कसून तपासणी केली जात असून जे बाहेरगावांहून आले आहेत, अशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत परभणी जिल्ह्यात १८८ संशयितांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे विशेषता: परराज्यातील अनेक कामगार अडकून पडले आहेत. तर कोणी वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू, कोरोनाच्या या प्रादुर्भाला गांर्भियाने घेत नसल्याचे चित्र आहे. 


 वसतिगृहात चौदा जणांची रवानगी
दरम्यान, परभणी येथून बुधवारी (ता.एक) सकाळी चार कामगार आग्य्राला जाण्यासाठी पायी रेल्वेपाटरीने निघाले होते. सेलू मार्गी जात असताना सेलू ठाण्याच्या पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावर यांनाही माहिती समजली. त्यांनी तात्काळ आपल्या सर्व सहकार्यांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जसपालसिंह कोटतीर्थवाले यांच्यासह संजय साळवे, हनुमान नाईक, रामा हातागळे, मोती साळवे, श्री माळगे या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुपारी  साडेचारच्या सुमारास या १४  जणांना सेलू रेल्वे स्थानक परिसरात परिसरात थांबविले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य  समजावून सांगितली. सर्वाची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.  सेलूतील नुतन महाविद्यालयातील श्रीरामजी भांगडीया वसतिगृहात त्यांची रवानगी करण्यात आली. या सर्वांचा जेवण व्यवस्था तसेच वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले पोलिस सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा ...
पाथरीतील सर्व रस्ते बंद
पाथरी (जि.परभणी) ः संचारबंदीच्या काळातही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रकार वाढल्यानंतर बुधवारी (ता. ३१) पालिका प्रशासनाने मुख्य रस्त्याला मिळणारे सर्व रस्ते बंद केले.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लोकडाउन असतानाही पाथरीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर येत असल्याचे प्रकार वाढला आहे. या बाबत तहसीलदारांनी एका पत्राद्वारे शहरात संचारबंदी असतानाही नागरिक बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार बुधवारी (ता. ३१) पालिका प्रशासनाने मुख्य रस्ता, साई रोडला मिळणारे सर्व गल्लीबोळांतील रस्ते बंद केले आहेत. यामुळे नागरिक रस्त्यावर येण्याचे व दुचाकी वाहने रस्त्यावरून वागणे काहीसे बंद होऊ शकते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT