Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

सावरकरांपेक्षा अण्णाभाऊ साठेंना द्या भारतरत्न : इम्तियाज जलील 

जगदीश पानसरे

औरंगाबादः हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर चालेल. मोदी, शहा किंवा उध्दव ठाकरे यांच्या बोलण्यावर चालणार नाही. इंग्रजांची माफी मागणारे आणि आरएसएसच्या विचारांना जवळचे असलेल्या सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. पण भारतरत्नचे खरे मानकरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. 

मी अजून चार वर्ष खासदार आहे, जेव्हा केव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी मला संसदेत भेटतील तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मातंग क्रांती मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. 

सिल्लोड तालुक्‍यातील अंधारी येथील विवाहित महिलेला तिच्या घरात घूसन एका बारचालकाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. या घटनेत त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तांना मोर्चा काढून निवदेन देण्यात आले. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी इम्तियाज जलील आले होते. 

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा

अंधारी येथील घटनेची माहिती कळताच मी संसदेत या विरोधात प्रश्‍न उपस्थित करून हिंगणघाट आणि अंधारी प्रकरणातील आरोपींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा अशी मागणी केली होती. समाजातील अशा घटना रोखायच्या असतील तर आपपल्या भागातील दारूची दुकाने बंद करा हीच या मयत ताईला खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल. अंधारी येथील बारचालकानेच हे भयानक कृत्य केले होते, त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी दारू विक्रीवर बंदी आणली पाहिजे. 

देशात सध्या वेगळेच वातवरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देश आपल्या इशाऱ्यावर चालेल असे वाटत आहे. पण हा देश त्यांच्या धोरणांनूसार चालणार नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर चालेल याचा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी केला. सरकारे येतात, जातात, ते फक्त पाच वर्ष असतात, पण समाज वर्षानुवर्ष असतो. आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यायचा असले तर आपण संघटित राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT