Aurangabad corona
Aurangabad corona Aurangabad corona
छत्रपती संभाजीनगर

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच संसर्ग, अधिकाऱ्यांना दालने सुटेनात

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून, अत्यावश्‍यक कामाव्यतीरिक्त इतरांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संचारबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी वारंवार आदेश दिले जात आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून शहरातील रस्त्यावर पुर्वीप्रमाणेच वाहनांची दिवसभर गर्दी आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून दिली असली तरी दोन दिवसानंतरही बहुतांश अधिकारी दालनातून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे या गर्दीला रोखणार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहीमेअंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून एक मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्‍यक सेवा, जीवनावश्‍यवक वस्तूंची दुकानांसह वाहतूक सुरूच ठेवण्यास शासनाने सूट दिली आहे. त्याचा फायदा घेत संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. गुरुवार (ता. १५) व शुक्रवार (ता. १६) दोन्ही दिवसी शहरातील मुख्य रस्त्यावर हजारो वाहनांची वर्दळ सुरू आहे. सिग्नलवर असलेल्या वाहनांच्या रांगावरूनच नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे.

विशेष म्हणजे विनाकरण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखणार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. काही भागात पोलिस बॅरिकेट लाऊन वाहने अडवून चौकशी करत असल्याचे चित्र असले तरी बहुतांश भागात रान मोकळे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ब्रेक द चेन’ मोहिम सुरू झाल्यापासून अमंलबजावणीसाठी विभागनिहाय्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पण हे अधिकारी आपल्या नेहमीच्या कामातून बाहेर येऊन काम करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यात झालेल्या बोटावर मोजण्याएवढ्या कारवायावरून हेच सिद्ध होते. वारंवार आदेश काढूनही जिल्हाधिऱ्यांना कोणी गांभीर्याने घेत नसल्याने रस्त्यावरची गर्दी वाढतच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT