Corona Completes Its One Year Presence In Aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाचे एक वर्ष: पहिला रुग्ण ते ५७ हजार ७०१ रुग्ण, हाल अपेष्टा अन्‌ कोंडमारा

मनोज साखरे

औरंगाबाद : चीनच्या वुहान प्रांतातून आलेला कोरोना विषाणु जगभरात पसरला. माणसांच्या संचारासह एकुणच जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. विदेशातून आलेली औरंगाबादेतील प्राध्यापिकेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येताच औरंगाबादकर धास्तावले. त्यापाठोपाठ औरंगाबादकरांना एक एक धक्का बसत गेला. १५ मार्च २०२० ला रुग्ण संख्या एकवरुन ती आज तब्बल ५७ हजार ७०१ एवढी झाली. या आकडेवारीसह आपण रोज कोरोनासोबत जगत असून याकाळात हाल अपेष्टा, मानसिक व भौतिकदृष्ट्या कोंडमारा झाला.

एका वर्षात अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे संथावले. अनेकांनी आपले आप्तेष्ठ गमावले. काहींच्या संसारात बेबनाव झाला. आर्थिक स्थिती डबघाईला आली ना-ना तऱ्हेची संकटे आली. सामुहिक संकटांना आज एक वर्ष पुर्ण झाले. या काळात आपण शहरातील १ हजार ३३९ जणांचा बळी गेला. साठ हजारांच्या आसपास लोक बाधित झाली. मार्च २०२० मधील लॉकडाऊन आजही आपल्या मानगुटीवर आहे. अर्थात वर्ष बदलले. पण स्थिती मात्र तिच आली आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगायचे आहे हे लक्षात घ्या. पण मास्क घालून व सॅनिटाईजेशन व सुरक्षित अंतर पाळूनच. कारण ५७ हजार ७०१ रुग्णांचे बाधित होणे आपल्यासाठी निश्‍चितच परवडणारे नाही.


१ रुग्ण ते ५७ हजार ७०१ रुग्ण बाधित
औरंगाबादेत २७ एप्रिल २०२० ला एकाच दिवशी २९ जण बाधित झाले. औरंगाबादकरांसाठी तो दिवस अत्यंत जड गेला. अर्थात एक दोन बाधित येत असताना अचानक २९ जण बाधित आल्याने सर्वांना धडकीही भरली. पण त्यानंतर याच संख्येच्या दहाच्या पटीत संख्या येऊ लागली. त्यातून अनेक वैद्यकीय समस्या उभ्या राहिल्या. औरंगाबादकरांनाही कधी वाटले नसेल एवढे अर्थात वर्षात ५७ हजार ७०१ रुग्ण आज बाधित झाले आहेत. सुखद बाब एवढीच की, यातील ५१ हजार ३८१ जण बरेही झाले आहेत.


वर्षभरात कोरोनाचे चढ-उतार
अक्टिव्ह रेट : ८.६३
औरंगाबाद शहराचा डिसेंबर- जानेवारी महिन्यात सर्वांत कमी अक्टिव्ह रेट होता. अर्थात शुन्याच्याही खाली गेला होता. परंतू झपाट्याने रुग्णसंख्या वाढल्याने तो आता झटकन ८.३३ वर पोचला आहे.

मृत्यूदर  : २.३२
औरंगाबाद जिल्ह्याच्या मृत्यूदरात काहीसे दिलासादायक चित्र आहे. २.३२ हा दर सध्या असून एवढा खाली कधीही आलेला नाही. पण चिंताजनक बाब अशी की, जसे रुग्ण वाढत आहेत, तसे मृत्यू होण्याचे प्रमाण दरदिवशी वाढत आहे.

रिकव्हरी रेट :   ८९.०४
गतवर्षी व अगदी जानेवारीपर्यंत ९६ टक्क्यांवर गेलेला रिकव्हरी रेट आता मात्र घसरला. तो आता ८९.०४ इतका खाली आला. चार दिवसांत साडेतीन हजारांवर रुग्ण वाढल्याने या रिकव्हरी रेटमध्येही घसरण सुरुच आहे.



पहिल्या रुग्ण म्हणतात...
मी रशियातून सुटी घालवुन औरंगाबादेत आले. त्यानंतर मला सर्दी व श्‍वास घ्यायला त्रास सुरु झाला. १५ मार्चला माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे मी व शहरातील नागरिकही प्रचंड धास्तावले. मी पहिली रुग्ण व माझ्यामुळे संसर्ग फैलावतो की काय या व्यथेने मनही व्यथीत झाले होते. पण आता मी नेहमी मास्क लावते व लसही घेतली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT