Aurangabad lockdown Aurangabad lockdown
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्याच्या सीमांवर चोवीस तास फौजफाटा लावण्यात आला आहे

सुषेन जाधव

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली कसून सरकारच्या ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये प्रवेश करणाऱ्या ६ जिल्हा सीमा (बॉर्डर) बंद (सील) करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यासंदर्भात काटेकोरपणे पालन करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवा, आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने आंतरराज्य तसेच जिल्हाबाहेर महत्त्वाच्या कारणांशिवाय जाण्यास बंदी केली आहे.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ६ सीमांच्या तपासणी नाक्यावर २४ तास पोलिसांच्या फौजफाटा तैनात असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या नियमांचा भंग करणाऱ्याविरोधात धडक कारवाई करण्यासाठी पोलीसांचे ६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्हाभरात मोठी लोकवस्तीचे गावे, बाजारपेठा, चौक, भाजी- फळे मार्केट आदि ठिकाणी गस्त घालणार आहेत.

८१ हजार रुपयांचा दंड वसूल-

कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात ग्रामीणमध्ये कलम १८८ नुसार १८ गुन्हे दाखल करण्यात आले. विनामास्क फिरणाऱ्याविरोधात नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्या संयुक्तरित्या कारवाई करत ४९ हजार २०० रूपये तर मोटर वाहन कायद्यान्वये १३५ वाहनधारकाविरूध्द ३२,२०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Uttarakhand Jewellery: मॉडर्न नववधूंची पहिली पसंती! हिमालयाच्या कुशीतील 'या' ५ पारंपरिक दागिन्यांपुढे सोन्याचे हारही फिके!

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT