lockdown in Aurangabad
lockdown in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus| संचारबंदीला पुन्हा रिकामटेकड्यांचा संसर्ग!

अनिल जमधडे

औरंगाबाद: राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिलदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक व्यवस्था सुरु ठेवली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत रिकामटेकड्यांचीही शहरभर भटकंती सुरुच आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी कडक भूमिका घेतली नाही, त्यामुळे या लॉकडाऊनचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र होते.

लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून संचारबंदीत काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. मात्र त्याचाच गैरफायदा घेतला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी घरामध्ये राहणे अपेक्षीत आहे. मात्र, नागरिकांना धाक नसल्याने सकाळपासूनच रस्त्यावरुन वर्दळ सुरु झाली होती. हळूहळू ही गर्दी वाढतच होती. विशेष म्हणजे चौकाचौकात दिसणारे पोलिस अनेक चौकात दिसत नव्हते.

ज्या भागात पोलिस गस्तीवर होते त्या भागात कमी वर्दळ होती, तर ज्या भागात पोलिस नव्हते त्या भागात मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने रिकामटेकड्यांनी दुचाकी, चारचाकी काढून रस्त्यांवरुन फिरण्याचा सपाटा लावला होता. दुकाने बाजारपेठ बंद असतानाही वाहनधारकांची मात्र रस्त्यावर मोठी गर्दी दिसत होती. विशेष म्हणजे जालना रस्त्यावरील सिग्नलही सुरुच होते. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी लॉकडाऊनचा परिणाम फारसा जाणवला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT