air-india
air-india Aurangabad-Mumbai Air India Plane Return
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-मुंबई एअर इंडिया विमान परतले, शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

अनिल जमधडे

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी (ता.एक) दुपारी साडेतीन वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. दुपारी साडेतीन वाजता मुंबईहून औरंगाबादला (Aurangabad) येणारे एअर इंडियाचे (Air India) विमान उतरु शकले नाही. हे विमान पुन्हा मुंबईला परत गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजेपासून आभाळ भरुन आले. त्यानंतर साधारण साडेतीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या काडाकाटासह धुवाँधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झाला. पाऊस इतका जोरदार होता की काही वेळातच संपूर्ण रस्ते जलमय झाले होते.

या पावसामुळे औरंगाबादला सुरु झाला. या आधार पावसामुळे मुंबई-औरंगाबाद हे एअर इंडियाचे विमान उतरु शकले नाही. विमान अर्धातास आकाशात घिरट्या घालत होते. पाऊस कमी होत नसल्यामुळे वाट पाहून हे विमान पुन्हा परत मुंबईला वळविण्यात आले, असे असले तरीही हेच विमान सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान परत मुंबईहून औरंगाबादला आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT