air-india Aurangabad-Mumbai Air India Plane Return
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-मुंबई एअर इंडिया विमान परतले, शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

अनिल जमधडे

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी (ता.एक) दुपारी साडेतीन वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. दुपारी साडेतीन वाजता मुंबईहून औरंगाबादला (Aurangabad) येणारे एअर इंडियाचे (Air India) विमान उतरु शकले नाही. हे विमान पुन्हा मुंबईला परत गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजेपासून आभाळ भरुन आले. त्यानंतर साधारण साडेतीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या काडाकाटासह धुवाँधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झाला. पाऊस इतका जोरदार होता की काही वेळातच संपूर्ण रस्ते जलमय झाले होते.

या पावसामुळे औरंगाबादला सुरु झाला. या आधार पावसामुळे मुंबई-औरंगाबाद हे एअर इंडियाचे विमान उतरु शकले नाही. विमान अर्धातास आकाशात घिरट्या घालत होते. पाऊस कमी होत नसल्यामुळे वाट पाहून हे विमान पुन्हा परत मुंबईला वळविण्यात आले, असे असले तरीही हेच विमान सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान परत मुंबईहून औरंगाबादला आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT