amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

कशामुळे भरतेय महापालिकेची तिजोरी वाचा...

माधव इतबारे

औरंगाबाद-महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट हळूहळू संपत आहे. नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी वसुलीकडे विशेष लक्ष दिल्यानंतर महापालिकेची भरभराट सुरू झाली असून, कधी-कधी मायनसमध्ये जाणाऱ्या महापालिकेच्या बॅंक खात्यात तब्बल चार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

खर्च अफाट आणि उत्पन्न कमी असल्यामुळे महापालिकेवरील आर्थिक संकट गेल्या काही वर्षांपासून गडद होत होते. कंत्राटदारांची देणी तब्बल अडीचशे ते तीनशे कोटींच्या घरात गेली होती. त्यामुळे कंत्राटदारांनी शहरातील विकासकामे बंद करून महापालिका मुख्यालयासमोर दोन ते अडीच महिने साखळी उपोषण केले. दररोजचा अत्यावश्‍यक खर्च 30 ते 35 लाखांच्या घरात असताना तिजोरीत मात्र 15 ते 20 लाख रुपये जमा होत होते; मात्र हे चित्र आता पालटले आहे.

नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर वसुलीकडे विशेष लक्ष दिले. वसुली वाढवा, अन्यथा मला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका, अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्याचबरोबर शहरातील बेकायदा मोबाईल टॉवरकडे त्यांनी आपली मोहीम वळविली. टॉवरपोटी तब्बल 30 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे टॉवर किंवा टॉवर असलेल्या मालमत्तांनाच सील लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तीन-चार दिवसांत महापालिकेने दीडशेपेक्षा अधिक टॉवर सील करून शहरातील मोबाईल नेटवर्क जाम करून टाकले.

त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी महापालिकेकडे नऊ कोटी रुपयांचा कर भरला. तसेच मालमत्ता कराच्या वसुलीतही वाढ झाली आहे. त्यामुळे खडखडाट असलेल्या महापालिकेच्या तिजोरीला भरभराटीचे दिवस आले आहेत. अनेकवेळा महापालिकेचे खाते मायनसमध्ये जात होते. या खात्यात आता चार कोटी रुपये जमा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT