Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

corona : औरंगाबादचा हा पॅटर्न आता देशभरात... केंद्र शासनाने काढले आदेश

माधव इतबारे

औरंगाबाद ः शहरातील व्यापारी आणि विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने जुलै महिन्यात घेतला होता. आता हा औरंगाबाद पॅटर्न देशभर पोचला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर १० ते १८ जुलै दरम्यान लॉकडाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील व्यापारी व विक्रेत्यांची अॅन्टीजेन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. जे व्यापारी चाचण्या न करता आस्थापना उघडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याने सुरुवातीला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर ठरावीक वेळ देण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा विरोध मावळला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात आल्याने त्याचे परिणाम देखील दिसून आले. सध्या औरंगाबाद शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद महापालिकेचा हा फॉर्म्युला केंद्र सरकारने स्वीकारला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करून घेण्याबद्दल कळवले आहे. औरंगाबाद महापालिकेची संकल्पना आता देशपातळीवर राबविली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

या उपक्रमांचीही घेतली दखल 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने ‘एमएचएमएच’ ॲप तयार केला. त्यात मृत्यू दर कमी करण्यासाठी ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा फायदा मृत्यूदर कमी करण्यासाठी झाला. त्यामुळे अनेक महापालिकांनी विचारणा करून हा ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच एक हजार मोबाईल फिवर क्लिनीक, शहराच्या एन्ट्री पॉइंटवर अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी अशा महापालिकेच्या विविध उपक्रमांची दखल घेतली गेली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
दिवसभरात २३६६ चाचण्या 
शहरात शनिवारी (ता. आठ) दिवसभरात महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या एन्ट्री पॉइंटवर ३२६६ जणांच्या अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात परळी वैजनाथ, परभणी, चंद्रपूर, केज (बीड), कळमनुरी या भागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोळा जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT