बाजारसावंगी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) : शिवारात वादळी वाऱ्याने उन्हाळी बाजरीचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. 
छत्रपती संभाजीनगर

विहामांडव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, बाजारसावंगीत कांदा, बाजरीचे नुकसान

दिवसभर पावसाचे तसेच थंड वातावरण नव्हते. दुपारी मात्र ढगाळ हवामान तयार होऊन काहीच वेळात पाऊस सुरू झाला.

अनिल गाभूड, श्रीधर पाटील

विहामांडवा/बाजरसावंगी (जि.औरंगाबाद) : विहामांडवा (ता. पैठण) (Paithan) येथे रविवारी (ता.१६) दुपारी दीड वाजता अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. यावेळी इंद्रानगर भागातील रमेश शिकारे यांच्या घरासमोरील लिंबाचे झाड या वादळी वाऱ्यात घराच्या बाहेरच्या बाजूने पाडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित व आर्थिकहानी झाली नाही. या अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये खुप गारवा निर्माण झाला होता. ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपीटचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. रविवारी दुपारी जोरदार वार्‍यासह पावसाची सुरवात झाली. त्याच सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. दिवसभर पावसाचे तसेच थंड वातावरण नव्हते. दुपारी मात्र ढगाळ हवामान तयार होऊन काहीच वेळात पाऊस सुरू झाला. यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान वादळी वार्‍यामुळे गावातील वीजपुरवठा (Electricity Supply Shut) बंद झाला. पावसाने गावातील सखल भागात पाणी साचले होते. या अवकाळी पावसामुळे पिकांना मात्र फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. या पावसाचा फळबागांनाही फटका बसला आहे. तर नुकसान भरपाई करण्याची मागणी परिसिरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (Aurangabad Rain Updates Rain Hits Onion, Millets In Khultabad)

कांदा, बाजरीचे नुकसान

बाजारसावंगी (ता.खुलताबाद) (Khultabad) परिसरात रविवार दुपारी पावणे चारच्या दरम्यान अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी बाजरीचे (Rain Hit Millets, Onion) पिक घेण्याचा प्रयत्न केल्याने बाजरी वादळी वाऱ्याने आडवी पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आज दुपारी एकपर्यंत तापमान ३८ अंश सेंटिग्रेड होते. मात्र अधुन-मधून ढगाळ वातावरण, वादळी वारे यामुळे बदल होऊन तापमान देखील ११ अंशाने कमी होऊन २७ अंश सेंटिग्रेड एवढे खाली आले. तीव्र उष्णतेऐवजी वातावरणात देखील गारवा निर्माण झाला. अचानक झालेल्या पावसाने कांदा बियाण्याच्या पिकाचे काढणीस आलेला कांदा तसेच उन्हाळी बाजरी व इतर पिकांचे थोड्या प्रमाणात वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे. दुपारी वादळी वारा असल्याने ढगांचा कडकडाटामुळे वीजपुरवठा देखील खंडित होता. परिसरात गावरान आंब्यासह केशर आंबा उत्पादन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तसेच आंबा उतरविण्याचा हंगाम असून वादळी वारा व पाऊस याचा त्यास तडाखा बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT