corona vaccine 
छत्रपती संभाजीनगर

लसीचा तुटवडा, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण तूर्तास बंद

नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत असला तरीही लस मिळण्यास अडचणी येत आहे. दर आठवड्याला एक लाख लस मिळावी अशी मागणी महापालिकेने केली आहे.

सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने जंम्बो लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मात्र दर आठवड्याला एक लाख लसीची मागणी असताना, सरकारकडून केवळ २५ ते ३० हजार लस मिळत आहे. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होताच महापालिकेने लसीकरणावर जोर दिला आहे. त्यासाठी ११५ वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी जम्बो मोहिम सुरू केली. आतापर्यंत ४५ वर्षावरील सुमारे २ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत असला तरीही लस मिळण्यास अडचणी येत आहे. दर आठवड्याला एक लाख लस मिळावी अशी मागणी महापालिकेने केली आहे. परंतु सरकारकडून २५ ते ३० हजार लस मिळत आहे. मागच्या आठवडयात अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे वॉर्डातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. जो पर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत लसीकरण सुरू केले जाणार नाही. लसीचा पुरसा साठा नसल्याने ४५ वर्षावरील नागरिकांनी केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT