corona vaccine
corona vaccine 
छत्रपती संभाजीनगर

लसीचा तुटवडा, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण तूर्तास बंद

सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने जंम्बो लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मात्र दर आठवड्याला एक लाख लसीची मागणी असताना, सरकारकडून केवळ २५ ते ३० हजार लस मिळत आहे. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होताच महापालिकेने लसीकरणावर जोर दिला आहे. त्यासाठी ११५ वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी जम्बो मोहिम सुरू केली. आतापर्यंत ४५ वर्षावरील सुमारे २ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत असला तरीही लस मिळण्यास अडचणी येत आहे. दर आठवड्याला एक लाख लस मिळावी अशी मागणी महापालिकेने केली आहे. परंतु सरकारकडून २५ ते ३० हजार लस मिळत आहे. मागच्या आठवडयात अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे वॉर्डातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. जो पर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत लसीकरण सुरू केले जाणार नाही. लसीचा पुरसा साठा नसल्याने ४५ वर्षावरील नागरिकांनी केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT