Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

एका उंदरामुळे औरंगाबादला ३२ तासानंतर सुरु झाला पाणीपुरवठा! नागरिकांची पाण्यासाठी ओरड

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पॅनल बोर्डात उंदीर गेल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पर्यायी रोहित्र बसवून गुरूवारी (ता.१८) सायंकाळी पाणी उपसा सुरू केला. पण शहरात प्रत्यक्षात पाणी येण्यासाठी तब्बल ३२ तासांचा अवधी गेला. शुक्रवारी (ता. १९) पहाटे पाणीपुरवठा सुरू झाला.


शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. बुधवारी (ता. १७) रात्री जायकवाडी येथील १४०० मिलिमीटरच्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत झाला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा एमआयडीसीतील ट्रान्सझेल्टा कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्क साधला. त्यांनी अर्ध्या रात्रीच रोहित्राची तपासणी केली, तेव्हा त्यातून ऑईल बाहेर आल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर काल पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बी. डी. घुले यांनी पर्यायी रोहित्र बसवून दुपारी चार वाजता पाणी पुरवठा सुरू केला. सायंकाळी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरात पाणी आले. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर सिडको-हडकोसह इतर भागांना पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र महापालिकेचे तब्बल ३२ तास वाया गेले. पॅनलमध्ये उंदीर अडकल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

लोकप्रतिनिधींसह नागरिकांची ओरड
पाणीपुरवठ्यात तब्बल २३ तासांचा खंड पडल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना फोन करून त्रस्त केले. आज आमच्या भागाला पाणी येणार की नाही? किती वाजता येईल, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT