औरंगाबाद - वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांची वीज कट झालेली आहे. त्यामुळे या शाळांची संगणक यंत्रणा बंद आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ५० शाळांमध्ये सौर दिवे लावण्यात येणार आहेत.
अनेक जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल थकलेले असून, काही ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरलेले आहे. वीज बील थकल्याने शाळेची वीज कट होण्याच्या कटकटीतुन कायमचा उपाय शोधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ठळक बातमी : दीड महिन्यात वीस कोटीच्या नियोजनाचे आव्हान
त्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ४ शाळांसाठी १ किलो वॅटची ५० हजारांपर्यंतची सोलार सिस्टीम बसविण्यात येणार आहे. ४ खोल्यांपेक्षा जास्त खोल्या असलेल्या शाळांमध्ये २ किलो वॅटची एक लाख रुपयांची सिस्टीम बसविण्यात येणार आहे.
हेही वाचा : स्टॅंप ड्युटीमुळे खेळण्याचे मार्केट संथ
ही सोलार सिस्टीम बसविल्यानंतर या शाळातील अंधार दूर होणार असून, संगणक यंत्रणाही सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ५० शाळा जोडण्यात येणार असल्याचे जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.
क्लिक करा : महापालिका निवडणुक : बदल किरकोळ, गडबडी कायम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.