Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण देशातील यंत्रणा कामाला लागलेली आहे; पण या लढाईत प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हाच सर्वोत्तम इलाज आहे. कर्तव्य निभावताना प्रत्येकाने जबाबदारीचे भाव ठेवणेही आवश्यक आहे, असे जाधववाडी येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी अनिल खरात म्हणाले. 

श्री. खरात म्हणाले, ‘‘कोरोनाला हरविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, यासाठी शहराच्या विविध भागांत पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

मात्र, नोकरी करून घरी परतताना, घरच्यांमध्ये मिसळताना, लेकरांना जवळ येऊ देताना निश्चितच भीती वाटते; पण कर्तव्यावर असताना दर दोन तासाला हाताला सॅनिटायझर लावून, नाका-तोंडावर मास्क लावणे, हात धुणे अशी काळजी घेत असतो. ड्युटी संपवून घरी गेल्यानंतर सरळ गच्चीवर जाऊन कपडे बदलतो व अंघोळ करूनच घरात प्रवेश करतो. असा दिनक्रम करून घेतला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. तसे केले तर कोरोनाला हरवणे आपल्याला सोपे होणार आहे. भीती असली तरी काळजी घेणे हा सध्यातरी सर्वोत्तम उपाय मानला जात आहे. त्यामुळे प्रत्येकानेच शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले कर्तव्य पार पाडावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Jarange and Vikhe Patil: उपोषण सोडण्याची घोषणा करण्याआधी जरांगेंनी विखेंना नेमके कोणते प्रश्न विचारले?

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीनेही उत्तम काम केले - एकनाथ शिंदे

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; भावूक होत म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

SCROLL FOR NEXT