photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : सरकारचे निर्देश धुडकावून  बॅंकांची तुघलकी वसुली 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कर्जाच्या हप्त्यासंबंधी पंतप्रधान व आरबीआयने निर्देश दिलेले असतानाही अनेक फायनान्स कंपन्या कर्ज वसूल करीत आहेत. अशा कंपन्यांवर व बॅंकांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले आहेत. काहींना दोन-दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे देशाचे पंतप्रधान यांनी २२ मार्चला गृहकर्जासह सर्व कर्जांचे हप्ते भरण्यास तीन महिने सूट दिली होती. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर यांनीदेखील कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने सूट दिली. २३ मे रोजी तशाप्रकारचे आदेश काढून सर्व बॅंक व फायनान्स कंपन्यांना निर्देश दिले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असे असतानाही औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सर्वत्र फायनान्स कंपन्यांनी निर्णयाची अंमलबजावणी न करता, कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. काहींच्या बॅंक खात्यावर जमा असलेल्या पैशांतून वसुली करण्यात येत आहे. काहींच्या खात्यातून दंड वसूल केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वच लोक त्रस्त आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

अशा परिस्थितीत कसे जगावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा फायनान्स कंपन्या व बॅंकांवर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपने दिला आहे. यावेळी भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. अभय टाकसाळ, तारा बनसोडे, कैलास कांबळे, गणेश कसबे, अशोक जाधव, बाबूराव पठाडे, मधुकर खिल्लारे, वसुधा कल्याणकर, प्रकाश बनसोडे यांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT