Minister Abdul Sattar Participate In Bharat Bandh 
छत्रपती संभाजीनगर

Bharat Bandh Updates : जुलमी कायदा रद्द न केल्यास शेतकरी सरकारला जागा दाखवून देईल - अब्दुल सत्तार

सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करित भारत बंद आंदोलनात सहभागी होत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता.आठ) सोयगाव व सिल्लोड येथे आंदोलन केले. सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना श्री.सत्तार म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय दोन-तीन दिवसांत जर नाही घेतला तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील.

जुलमी कायदा रद्द न केल्यास जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवून देईल. शिवसेना कायम शेतकरी हिताचे निर्णय घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर लाखोंच्या संख्येने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नियोजन करण्यात येऊन लाखोंच्या संख्येने दिल्ली धडक देण्याचे विधान सत्तार यांनी केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: रिक्षावाल्या लेकाची माय! आईनं सांगितली पोराच्या प्रेमाची कहाणी; औषधाला पैसे नसतात तेव्हा...

'लोक पायऱ्या चढत होते, अचानक सिंह आला आणि...' थरकाप उडवणारा प्रसंग एकदा बघाच, viral video

Mohammed Rafi's magic Story: 102 डिग्री ताप असूनही मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'या' अप्रतिम गाण्याचे, सहा दशकानंतर आजही आहेत लाखो चाहते!

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर ऑईल व काॅईल सह साहित्याची चोरी

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

SCROLL FOR NEXT