BJP Shivsena activists tear down each others banners in aurangabad bjp jal aakrosh morcha  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्सची फाडाफाडी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : पाणिटंचाईच्या मुद्यावर आज शहरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला. दरम्यान या मोर्चाच्या वेळी शहरात लावण्यात आलेल्य़ा बॅनर्सवरून शिवसेना-भाजपमध्ये एक नवा वाद सुरू झाला आहे. (bjp jal aakrosh morcha)

भाजप शिवसेना वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे, शिवसेनेकडून आम्ही पाणीपट्टी आर्ध्यावर आणलीय तुम्ही गॅस सिलेंडरचे भाव आर्ध्यावर आणणार करणार काय? असा सवाल शिवसेनेकडून या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला होता. तर भाजपने शहरात जलआक्रोश मोर्चाचे बॅनर लावले आहेत, याच्याच बाजूलाच शिवसेनेने गॅस दरवाढीवरून प्रश्न विचारत हे बॅनर लावले होते, ते बॅनर अज्ञात भाजप कार्यकर्त्यांनी फाडल्याचे समोर आले आहे.

सेना आणि भाजप यांच्यात बॅनर युध्द सुरु आहे. महात्मा फुले चौक ते सांस्कृतिक मंडळापर्यंत मोर्चाच्या मार्गावर असलेले बॅनर अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. दरम्यान यापुर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपचे बॅनर फाडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भाजपकडून बॅनर फाडण्यात आल्यानंतर यावर शिवसेनेची भूमिका काय असेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

SCROLL FOR NEXT