BJP Shivsena activists tear down each others banners in aurangabad bjp jal aakrosh morcha  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्सची फाडाफाडी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : पाणिटंचाईच्या मुद्यावर आज शहरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला. दरम्यान या मोर्चाच्या वेळी शहरात लावण्यात आलेल्य़ा बॅनर्सवरून शिवसेना-भाजपमध्ये एक नवा वाद सुरू झाला आहे. (bjp jal aakrosh morcha)

भाजप शिवसेना वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे, शिवसेनेकडून आम्ही पाणीपट्टी आर्ध्यावर आणलीय तुम्ही गॅस सिलेंडरचे भाव आर्ध्यावर आणणार करणार काय? असा सवाल शिवसेनेकडून या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला होता. तर भाजपने शहरात जलआक्रोश मोर्चाचे बॅनर लावले आहेत, याच्याच बाजूलाच शिवसेनेने गॅस दरवाढीवरून प्रश्न विचारत हे बॅनर लावले होते, ते बॅनर अज्ञात भाजप कार्यकर्त्यांनी फाडल्याचे समोर आले आहे.

सेना आणि भाजप यांच्यात बॅनर युध्द सुरु आहे. महात्मा फुले चौक ते सांस्कृतिक मंडळापर्यंत मोर्चाच्या मार्गावर असलेले बॅनर अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. दरम्यान यापुर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपचे बॅनर फाडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भाजपकडून बॅनर फाडण्यात आल्यानंतर यावर शिवसेनेची भूमिका काय असेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT