Chatrapti Sambhji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrapti Sambhji Nagar : आत्मज्ञानाच्या मार्गात अहंकार मोठा अडथळा

पंडित महेश पूर्णपात्रे; परंपरेतून चालत आलेले वेदांचे ज्ञान अथांग

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असून आत्मज्ञानाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. त्यामुळे माणसाने ‘मी’पणाच्या या रोगातून बाहेर पडण्यासाठी योगसाधनेचा वापर करावा. आयुर्वेद हे असे ज्ञान आहे जे संकलन करुन इतरांना द्यावे.

भारताच्या इतिहासाचा एक भाग म्हणजे वेद, ज्याद्वारे शरीर, मन आणि भावनांवर नियंत्रण ठेवता येते, असे मार्गदर्शन संस्कृत विशारद पंडीत महेश पूर्णपात्रे यांनी केले.

श्री श्री जगद्‍गुरू शंकराचार्य महासंस्थानम्, दक्षिणाम्नाय श्री शारदापीठम् शृंगेरी, श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठाण, श्रीकृष्ण गुरुकूल वेदपाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दोन दिवसीय वैदिक संमेलन सुरु आहे. यात शुक्रवारी (ता.चार) सकाळच्या चर्चासत्रात श्री. पूर्णपात्रे यांनी वेदांवर भाष्य केले.

ते म्हणाले, की आयुर्वेदात सर्व रोगांचे अंतिम कारण निसर्गाच्या नियमांचे माणसाने केलेले विकृत रूप सांगितले आहे. म्हणून पहिल्यांदा निसर्गाचा आदर करायला शिका. परंपरेतून चालत आलेले वेदांचे ज्ञान अथांग आहे. ते इतरांना दिल्याने परमानंद प्राप्त होतो. सगळ्या वेदांचे सार यज्ञात आहे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पहिल्यांदा शरीराचे लाड करणे बंद करा, तरच ते कठोर होईल.

मला ईश्वराचे ऐश्वर्य नको, मला इश्वरच पाहिजे यासाठी ध्यान करायला हवे. स्वतःला ईश्वराला समर्पित करा, त्याच्याशी एकरुप व्हा. सूक्ष्म धर्मचिंतन व गंभीर ब्रम्हचिंतन वेदांमुळेच शक्य होते. मूर्धन्य विचारांची खळाळती ज्ञानधारा वेद आहेत. ईश्वर दर्शन, समाधीलाभ, मोक्षानंद, स्वानंदलाभ वेदामुळेच मिळतो. नेत्रदर्पण, स्थैर्य, वामनवली, विविध मुद्रा याविषयीही त्यांनी माहिती दिली.

गुरुवर्य शांताराम भानुसे गुरुजी यांनी सांगितले, की विश्वाचे वाड्‍मय म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद असे चार वेद आहेत. प्राचीन काळी सप्तर्षी नावाचा सात ऋषींचा समूह होता. वेदांमध्ये या सात ऋषींना वैदिक धर्माचे रक्षक मानले गेले आहे.

या ऋषींवर विश्वाचा समतोल राखण्याची आणि मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी आहे. वेदांमध्ये नमूद केलेल्या श्लोकात वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, भारद्वाज, अत्री, जमदग्नी, गौतम ऋषी या सप्तऋषींची नावे सांगितली आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, सप्तर्षींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मष्तिकातून झाली असून त्यांना ज्ञान, विज्ञान, धर्म-ज्योतिष आणि योग या सर्वांत श्रेष्ठ मानले आहे.

वेदांची परंपरा टिकून राहण्यासाठी वैदिक संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जाते. असे संमेलन देशभरात नऊ ठिकाणी होतात. राज्यातील संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे होत असल्याने शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे भानुसे गुरुजी म्हणाले. दुपारच्या सत्रात वैदिकशास्त्रांवर परिसंवाद झाला. त्यानंतर पद्मश्री व्ही. आर. गौरीशंकर यांच्याहस्ते वैदिक विशारद पंडितांचा सत्कार करण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT