3RTE 
छत्रपती संभाजीनगर

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, औरंगाबाद जिल्ह्यात ५०९८ पैकी ११९९ जागा रिक्त

संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोनाचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ५८४ शाळांमध्ये ५ हजार ९८ जागांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून १ हजार १९९ जागा रिक्त राहिल्या आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेत अडीच ते तीन हजार प्रवेश झाले. ज्यांचे नाव प्रतीक्षा यादीत (दुसऱ्या फेरीत) होते.

त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रतीक्षा यादीत प्रवेशासाठी १ हजार ५४९ जणांची निवड झाली होती. त्यापैकी केवळ ४१२ जणांनीच प्रवेश निश्चित केले. ज्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव आले नव्हते, अशांना दिलासा देणारी बाब म्हणजे तिसरी प्रवेश फेरी घेण्यात आली. त्यात ४८९ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. त्यापैकी ७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती.शाळांना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन सोमवारपर्यंत (ता.३०) प्रवेश निश्‍चिती करायची आहे.


आरटीई प्रवेशाची स्थिती
एकुण शाळा - ५८४
प्रवेश क्षमता - ५ हजार ९८
आतापर्यंत झालेले प्रवेश - ३ हजार ८९९
रिक्त जागा - १ हजार १९९

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT