संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

शाळा संचमान्यतेसाठी आधारकार्ड अपडेटला ही मोठी अडचण... 

संदीप लांडगे

औरंगाबाद ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शाळा बंद असताना शालेय शिक्षण विभागाने मागच्या वर्षीसह यावर्षीची संचमान्यता करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केल्याशिवाय शाळांची संचमान्यता होणार नसल्याची अट घालण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट कसे करावे? तसेच अनेक शिक्षक कोरोनाच्या ड्युटीवर असल्यामुळे या कामासाठी कधी वेळ काढावा? असे अनेक प्रश्‍न शाळा आणि शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत. 

२०१९-२० यावर्षीची संचमान्यता करण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, सरकार बदलानंतर आता या निर्णयात बदल करण्यात आला. यामध्ये २०१९-२० व २०२०-२१ या काळातील संचमान्यता करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. आधार कार्ड अपडेटशिवाय दोन्ही वर्षांची संचमान्यता होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिकणारी मुले आपापल्या जिल्ह्यात, राज्यात निघून गेली आहेत. 

तसेच गेल्या वर्षी जे विद्यार्थी शाळेत होते, ते आता इतर ठिकाणी गेले आहेत, त्यांची संचमान्यता कशी करावी, असा प्रश्‍न शिक्षकांसमोर आहे. औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले आहेत. तर ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत. औरंगाबाद विभागात एकूण २६ लाख १४ हजार ६९३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १३ लाख २३ हजार ३२३ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट आहेत, तर १२ लाख ९१ हजार ३७० आधार कार्ड अपडेट करणे बाकी आहे. 

सक्ती योग्य आहे का? 
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे संचमान्यतेसाठी लागेल, अशा सूचना वर्षाच्या सुरवातीला शिक्षण विभागाकडून दिल्या होत्या. परंतु सद्यःस्थितीत कोरोनामुळे विद्यार्थी आधार कार्ड द्यायला शाळेत येऊ शकत नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. अनुदानित शाळेच्या संचमान्यता व शिक्षक पदसंख्या ही विद्यार्थीसंख्येनुसार निश्चित होते. जर आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संचमान्यता निश्चित होणार असेल; तर आधार नसलेले विद्यार्थी शाळाबाह्य ठरले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न शाळांकडून उपस्थित केला जात आहे. त्याची सक्ती नको, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. 

 
जिल्हानिहाय आकडेवारी 

जिल्हा एकूण विद्यार्थी आधारकार्ड अपडेट अपडेट बाकी
औरंगाबाद ९,४७,७२१ ३,६१,६९८ ५,८५,४२३
बीड ५,८९,६८९ २,६७,२१७ ३,२२,४७२
हिंगोली २,३५,४७९ १,२३,७६३ १,११,७१६
जालना ४,३६,४५२ ३,०२,१८७ १,३४,२६५ 
परभणी ४,०५,९५२ २,६८,४५८ १,३७,४९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT