Crop Destroyed due to heavy rainfall
Crop Destroyed due to heavy rainfall 
छत्रपती संभाजीनगर

शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?

सुषेन जाधव

औरंगाबाद: मागील आठवड्यात खुलताबाद तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पीकनुकसानीचा पंचनामा न करणाऱ्या शेतकऱ्यांची परवड थांबता थांबत नाही. कृषी विभाग, महसूल अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर अखेर पीकनुकसानीचा पंचनामा झाला खरा, नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळेलही; मात्र अरुंद नाल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने तो नाला शेतकऱ्यांनीच रुंद करून पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, असा पवित्रा महसूल विभागाने घेतल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

सुवर्णा बाळू जाधव या शेतकरी महिलेने सांगितले, की (शिवार गोळेगाव, ता. खुलताबाद) २४ जुलैच्या रात्री घोडेगाव-गोळेगाव (ता. खुलताबाद) शिवारात मुसळधार पाऊस झाल्याने अरुंद नाला असल्याने पाण्याचा प्रवाह शेतात आल्याने भाजीपाला पिकांचे एक एकर क्षेत्रावरील पूर्णपणे नुकसान झाले. क्षेत्रात मागील वर्षी अडीच लाख रुपये मिळाले होते. यंदा जवळपास एक लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याचे सुवर्णा म्हणाल्या.

कृषी विभाग, महसूल झोपेतच
कृषी विभाग, महसूल अधिकाऱ्यांना कळवूनही न आल्याने कार्यालयांवर ठिय्या घेतल्याने संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यात आला; मात्र महसूलचे कोणीच अधिकारी आले नव्हते. मुळात सुवर्णा या आत्मांतर्गत क्रांती ज्योती शेतकरी गटाच्या सदस्या असल्याने आत्माचे अधिकारी पाठक यांच्यासह पल्लवी गायकवाड या संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर गेल्यानंतर महसूलकडून पंचनामा करण्यात आल्याचे शेतकरी अरुण गोल्हार यांनी सांगितले.

त्यादरम्यान तलाठी यांनी कृषी पर्यवेक्षक श्री. तोरवणे यांना जाऊन पंचनामा करण्याचे सांगितल्यानंतरच पंचनामा झाला. त्याआधी का होऊ शकला नाही असा सवालही गोल्हार यांनी उपस्थित केला.

संबंधित प्रकरणाची चौकशी करून पावले उचलली जातील. याशिवाय सदर नाल्याचा नैसर्गिक प्रवाह शेतकऱ्यांनी बदलला की आधीपासूनच आहे, याचाही विचार करावा लागेल. तलाठी, पर्यवेक्षक यांच्यविषयी माहिती घेणार आहे.
- राहुल गायकवाड, तहसीलदार, खुलताबाद

मागील दहा वर्षांत असा पाऊस झाला नव्हता. तलाठी अप्पांनी आम्हाला ‘तुम्ही म्हणाल तसा पंचनामा करून घेता येईल’ असे सांगून कृषी पर्यवेक्षकांना पंचनामा करायला पाठविले. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह असो की शेतकऱ्यांनी केलेला असो. माहिती घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे.
- अरुण गोल्हार, अध्यक्ष, क्रांती ज्योती शेतकरी गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

VIDEO: अन् अनुष्कानं थेट हात जोडले; आरसीबी मॅच जिंकताच विरुष्काचं हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

SBI Hiring: स्टेट बँक देणार हजारो नोकऱ्या! 3,000हून अधिक नवीन शाखा उघडण्याची बँकेची योजना

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

SCROLL FOR NEXT