curfew in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus :औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची बातमी : येते ४८ तास...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव राज्यासह देशात वाढत आहे. या महामारीची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लॉकडाऊनच्या उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत; मात्र तरीही बहुतांश नागरिक रस्त्यांवर दिसत आहेत. त्यांच्याकडून फारशी जागरूकता बाळगली जात नाही. त्यामुळे आता प्रेमाने बस झाले, घरातच बसा; अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सक्त इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. त्या अंतर्गत येत्या ४८ तास कुणालाच घराबाहेर पडता येणार नाही. जर कुणी व्यक्ती घराबाहेर निघाली तरच तिला दंडुके देत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

सूत्रांनी माहिती दिली की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बहुतांश नागरिक मात्र लॉकडाउनला सहजरीत्या घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गर्दी टाळा अन्यथा कडक पाउले उचलावी लागतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, आता पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना लॉकडाउन आणखी कडक करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळेच आता ४८ तास प्रशासन कुणाचीही गय करणार नाही. एकप्रकारे खूप प्रेमाने झाले, आता घरी बसावेच लागेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे ता. ३० आणि ३१ मार्च औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची राहणार असून, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.  

शहरातील पन्नास जणांविरोधात कारवाई 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतानाही विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास पन्नास नागरिकांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत गरज असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभर घरांमध्ये बसून कंटाळा आलेले नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यासाठी खोटे बहाणे सांगत आहेत.

अशा विनाकारण फिरणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर कारण खोटे आहे, असे लक्षात येताच पोलिस चांगलाच प्रसाद देत आहेत. आता मात्र नागरिकांना फटके देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, उस्मानपुरा, एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२८) शहरातील विविध पोलिस ठाण्यांत जवळपास ५० विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT