Curfew In Aurangabad To Fight With Coronavirus 
छत्रपती संभाजीनगर

संचारबंदी गेली उडत ; बाजार समिती तोबा गर्दी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जीवनावश्यक वस्तू मध्ये मोडल्या जाणाऱ्या भाजीपाला खरेदीसाठी मंगळवारी (ता.२४)बाजार समिती तोबा गर्दी झाली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या असल्या, तरी नागरिकांना त्याची कसलेच गांभीर्य नाही. यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदीची पायमल्ली नागरिकांतर्फे केली जात आहे. 

बाजार समितीत सकाळी सहा वाजेपासून खरेदीसाठी मोठी गर्दी झाली.३१ मार्च पर्यंत संचारबंदी असल्यामुळे भाजीपाला मार्केट बंद राहील. या अशा भीतीने लोक खरेदीसाठी बाजार समितीत आले. बाजार समितीमधील फळे व भाजी विक्रेत्यांनी दोन दिवस बंद ठेवून ठेवण्याची निर्णय घेतला होता.  मात्र  फळे भाजीपाला ते जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे ते बंद ठेवता येत नाही. सनाच्या निर्णयानुसार भाजीपाला व फळे विक्री विक्री सुरूच राहणार असल्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

  नागरिकां मास्क रुमालही बांधले नाही.

संचारबंदी मध्ये जीवनावश्यक वस्तू सोडता सर्व बाजारपेठा व इतर दुकाने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही बाजार समितीत नागरिकांनी काहीच गांभीर्य लक्षात न घेता खरेदीसाठी गर्दी केली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क रुमालही बांधलेले नव्हते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 पोलिसांची व्यवस्था नाही 
बाजार समितीने हात धुण्यासाठी एकाठिकाणी ड्रम ठेवला होता. एवढं सोडता दुसरी काहीच सुविधा देण्यात आलेली नाही. या गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे येथे कुठलीही पोलिसांची व्यवस्था नव्हती यामुळे या गर्दीवर कुठलाही प्रकारचे नियंत्रण करता आले नाही ही गर्दी जवळपास दहा वाजेपर्यंत अशीच होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT