file photo 
छत्रपती संभाजीनगर

रब्बीसाठी जिल्ह्यात एवढे टक्‍के पीककर्जाचे वाटप

प्रकाश बनकर

औरंगाबाद: शेतकऱ्यांना सातत्याने आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज हा मोठा आधार ठरतो. परंतु बॅंकाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी बॅंकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी अवघे 9.88 टक्केच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

रब्बी हंगामासाठी 1 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविली जात आहे. सुरवातीपासूनच पीककर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षासाठी रब्बीसाठी 181 कोटी 43 लाखांचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले होते. यातील तीन महिन्यांत दिलेल्या उद्दिष्टापैकी अवघे 9.88 टक्केच पीककर्ज वाटप झाले.

व्यापारी बॅंकांकडून सर्वाधिक कर्जवाटप

जिल्ह्यातील 5 हजार 933 शेतकऱ्यांनाच बॅंकांनी पीककर्ज दिले. यामध्ये सर्वाधिक कर्जवाटप व्यापारी बॅंकांकडून करण्यात आले. व्यापारी बॅंकांनी 4,830 शेतकऱ्यांना 46 कोटी 47 लाख कर्जवाटप केले. शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा बॅंकेने सर्वात कमी अवघ्या 493 शेतकऱ्यांना 70 लाख 11 हजार रुपयांचे (0.39 टक्के) कर्ज वितरित करण्यात समर्थता दर्शविली. 

पेरणीचे संकट उभे राहिले.

मागील वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातीच काहीच उरले नाही. यंदा अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात हाती आलेले पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामात पेरणीसाठी पैसाच उरला नसल्याने पेरणीचे संकट उभे राहिले. अवकाळी पाऊस आणि खरिपासाठी वाटप झालेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार दिला. परिणामी रब्बीच्या पीककर्ज वाटपावर परिणाम झाला आहे. बहुतांश बॅंकांनी कर्जवाटप प्रक्रिया थांबविल्याने अत्यल्प कर्जवाटप झाले आहे. 

कर्जमाफी मूळे नवे कर्ज घेण्यास शेतकऱ्यांची ना-ना 
परतीच्या पावसामूळे झालेले नुकसानामूळे खरीपाचे पिक वाया गेले. खरीपासाठी काढलेले पिक कर्जांचे पैस कुठुन फेडायचे हाच प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यात नुकसानीचे आठ हजारही बहुतांश शेतकऱ्यांचा खात्यात जमा झालेले नाही. आता रब्बीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अशातच नवे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्या उत्साही नाही. आधि कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांना मिळाल्यावर शेतकरी नवीन कर्ज घेणार आहे. महाआघाडी सरकारने 2 लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. याची प्रक्रीया आद्यापही सुरु झालेली नाही. त्यामूळे काही शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज पाहिजेत आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रीयाबरोबर नवीन कर्ज मिळेल अशी शेतकऱ्यांना अशा आहे.

बॅंक शेतकरी कर्जवाटप टक्केवारी जिल्हा बॅंक 493 70.11 लाख 0.39  व्यापारी बॅंका 4830 46.47 लाख 15.68 ग्रामीण बॅंक 610 5.8 लाख 9.98  एकूण 5,933 5 कोटी 21 लाख  9.88 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

War Impact on India: पश्चिम आशियातील संघर्ष भारताला किती महाग पडणार? तेल, महागाई, रुपया आणि शेअर बाजारावर वाढला दबाव

IPL 2026: आनंद गगनात मावेना... पाटिदारसह, विराटने धरला ठेका, ढोलच्या गजरात बंगळुरूच्या खेळाडूंचा धुमाकूळ; RCB ने शेअर केला भारी Video

राष्ट्रीय कबड्डी प्लेअर अनुष्काची हत्या, फूड स्टॉल चालवणाऱ्या तरुणाने दीड महिन्यांपूर्वी केलेलं अपहरण, दारू पाजली अन्...

Mumbai-Goa Highway: खारपाडा येथील टोलनाका बंद पाडला, जनआक्रोश समिती आक्रमक; आधी कामे पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Update : लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी पुन्हा रांगा; ऑनलाइन बुकिंगनंतरही ग्राहकांची फरफट

SCROLL FOR NEXT