संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील बंधाऱ्यांचे दरवाजे गायब

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - वाहून जाणारे पाणी थांबवून त्या - त्या भागातील जनतेला त्याचा लाभ व्हावा, यासाठी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येतात. मात्र त्यांची देखरेख, दुरुस्तीच्या कामांची वाट लागली आहे. मराठवाड्यातील जवळपास 3 हजार 43 बंधाऱ्यांपैकी 177 बंधाऱ्यांना गेटच नाहीत, तर 319 बंधारे सुस्थितीत नसल्याचे समोर आले असून, प्रशासकीय पातळीवर दरवर्षी केवळ चर्चाच होत आहे. मराठवाड्यातील पाणीप्रश्‍न, सिंचनाचे झपाट्याने कमी होणारे क्षेत्र याची मागील काही वर्षांपासून चर्चा होत आहे. मात्र, हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नाही, हे वास्तव आहे. 

देखभाल करण्याचा कार्यक्रम रामभरोसेच
वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तसेच त्याचा लाभ सदरील भागातील लोकांना व्हावा, यासाठी मृद व जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग यांच्यामार्फत कोल्हापुरी बंधारे बांधले जातात. मात्र, पुढे त्यांची देखभाल करण्याचा कार्यक्रम रामभरोसेच असतो. मराठवाड्यातील बंधाऱ्यांना दरवाजेच नसल्याचा मुद्दा दोन वर्षांपूर्वी खूप गाजला. मात्र, पुढे जैसे थे अशी स्थिती आहे. यंदाचे चित्र फार काही वेगळे नाही. मराठवाड्यात दोन्ही विभागांचे एकूण 3 हजार 43 एवढे बंधारे आहेत. त्यामध्ये 172 बंधाऱ्यांमध्ये प्रवाह नसल्यामुळे पाणी साठू शकले नाही. तर 177 बंधाऱ्यांना दरवाजेच नसून 319 बंधाऱ्यांचे बांधकामच सुस्थितीत नाही. 

फक्त पावसाळ्यातच चर्चा 
26 नोव्हेंबर 2019 अखेर 37 हजार 766 एवढे हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले. तसे हे क्षेत्र अत्यंत कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात या विषयाची चर्चा होते. बैठकाही घेतल्या जातात. हा विषय यंदा महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येते. अधिकारी तेवढ्यापुरता पुढाकार घेतात. मात्र, पुढे काहीही होत नाही, हे आत्तापर्यंत घडत आले आहे. त्यामुळे यंदा तरी पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणार का, हा प्रश्‍नच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT