Farmers Agitation In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी

मधुकर कांबळे

औरंगाबाद : या वर्षीच्या पावसाळ्यात आधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यात पुन्हा परतीच्या पावसाने नुकसानीत भर पाडली. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रूपयांची अर्थिक मदत देण्या यावी अशी मागणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. या दरम्यान पोलिसांशी आंदोलक शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. त्यात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमाल टाकून देत सरकार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.


यावर्षीच्या पावसाने कहरच केला.सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. त्यात शेतीच बरेच मोठे नुकसान झाले. त्याचा हिशोब लावत नाहीत तोच परतीच्या पावसानेही चांगलेच झोडपले आहे. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने व परतीच्या पावसाने खरिपाची उभी पिके, काढणी करून ठेवलेली पिके सडली आहेत. कापुस, तूर, मुग, भुईमुग, सोयाबीन, उडीद, बाजरी, मका यांच्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे. यामुळे हवालदिल झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१९) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.

जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन गनीमी काव्याने केले जाणार असल्याने आंदोलक केंव्हा येतील याचा नेम नव्हता त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. तरीही अचानक आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले, त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ७५ हजार रूपयांची अर्थिक मदत देण्यात यावी अशा घोषणा देण्यास सुरूवात केला. कार्यालयाच्या पोर्चमध्ये या घोषणा दिल्या जात होत्या.

पोलिसांनी त्यांना आंदोलन परिसराबाहेर करण्याचे सांगीतले. यावेळी पोलिस आंदोलकांत बाचाबाची झाली. आंदोलकांनी सोबत आणलेले सोयाबीन, टोमॅटो, मका , बाजरी आदी शेतमाल तिथेच फेकून दिला. पोलिसांनी त्यांना बाहेर काढून रस्त्याच्या पलिकडे आंदोलने , उपोषणे होतात तिथे सोडले. त्या ठिकाणी आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या दिला. नंतर शिष्टमंडळांने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मागण्या
० पंचनामे न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विनाअट सरसकट हेक्टरी ७५ हजार रूपयांची मदत दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
० जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
० नुकसान झालेल्या फळबागासाठी हेक्टरी १ लाख रुपये तातडीची मदत द्यावी
० रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत द्यावी
० कृषी पंपाचे सरसकट वीज बील माफ करावे
० खरिप हंगामासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत बॅंकांनी दिलेले पिक कर्ज माफ करावे
० फळबागांसहित सर्व पिकांचा पिकविमा तात्काळ मंजूर करावा.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT