संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

महत्त्वाची बातमी...अखेर बोर्डाने चूक मान्य केली

संदीप लांडगे

औरंगाबाद - यंदा दहावीच्या प्रश्‍नपत्रिकेत चुकाच चुका आढळून येत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थीही गोंधळले आहेत. आतापर्यंत इंग्रजी, भूमिती आणि विज्ञान भाग एकच्या प्रश्नांत चुका आढळल्या होत्या. बुधवारी (ता. १८) घेण्यात आलेल्या विज्ञान भाग दोनमध्येही मोठ्या प्रमाणात चुका होत्या. यात मंडळाने आपली चूक मान्य करीत विज्ञानाच्या चुकीच्या प्रश्‍नांची विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचे सांगितले आहे. 

विद्यार्थ्यांचा उडाला होता गोंधळ  
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता. १६) दहावीच्या विज्ञान भाग एकच्या प्रश्‍नपत्रिकेत वारंवारितासंबंधी आलेल्या एक मार्काची चूक झाली होती. त्यानंतर बुधवारी (ता. १८) पुन्हा विज्ञान भाग दोनच्या प्रश्‍नपत्रिकेमध्येही गोंधळ दिसून आला. मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या पेपरमधील भाषांतरात ही चूक झाली असून, इंग्रजी माध्यमाच्या पेपरमध्ये प्रश्न एक-एमधील तीन क्रमांकाचा प्रश्न ‘इनकम्प्लीट’ऐवजी तेथे ‘इन’ ‘कंप्लीट’ असे झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला; तसेच प्रश्न क्रमांक तीनमध्ये सहाव्या प्रश्नात रिकाम्या चौकटीत अंक एक ते सहा टाकणे आवश्यक होते. कारण एका गुणास दोन नावे हे विज्ञानाचे प्रमाण आहे, यात आकृती काढणे अपेक्षित नव्हते. कारण आकृती काढायला वेळ लागतो. पेपरसेटरने पुस्तकातून जशीच्या तशी आकृती टाकल्यामुळे ही चूक झाली होती; तसेच प्रत्येक प्रकरणनिहाय गुण किती असावेत हे बोर्डाने अगोदरच ठरवले असताना प्रश्‍नपत्रिका काढणाऱ्यांनी स्वतःचे नियम बनवून प्रश्‍नपत्रिका काढल्याचे दिसून आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आता देणार गुण
विज्ञान एकमध्येसुद्धा एका ठिकाणी जागेबाबत अस्पष्टता होती. याबाबत बोर्डाने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे विज्ञान भाग दोनमधील आकृतीच्या प्रश्‍नाला मराठी व इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन गुण व प्रश्‍न क्रमांक एकमधील तीन क्रमांकाला प्रत्येकी एक मार्क देण्याची सूचना दिली आहे; तसेच विज्ञान भाग एकमधील वारंवारितासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नालाही एक गुण दिला जाणार आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चूक बोर्डाची शिक्षा विद्यार्थ्यांना 
बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेत यंदा मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे दिसून येत आहे. बोर्डाच्या नियमाप्रमाणे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या विद्यार्थ्यालाच गुण दिले जातात; मात्र प्रश्‍नच चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेदरम्यान गोंधळ होत आहे. चुकीचा प्रश्‍न विद्यार्थी वेळेअभावी टाळतात. परिणामी, विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात, बोर्डाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळत असल्याची भावना पालकांमध्ये आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT