Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

घराचं गोदाम केलंय का लोकांनी : दुकानांमध्ये फक्त दीड महिना पुरेल एवढा किराणा

प्रकाश बनकर

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचा तुटवडा जाणवेल या भीतीपोटी नागरिकांनी एक ते दीड महिन्याचा किराणा भरून ठेवला आहे; मात्र मार्केटमध्ये प्रत्येक किराणा दुकानदार व मॉलमध्ये दीड महिना पुरेल एवढा किराणाचा साठा असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी दिली. 

राज्य प्रशासनाने जिल्हा व राज्याच्या सीमा अत्यावश्यक सेवेसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे बाहेरजिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून होणाऱ्या किराणा माल, डाळी, तेलांचा पुरवठा पूर्ववत होत आहे.

यामुळे किराणा व तेलाच्या किमती कमी झाल्या असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. सोयाबीन तेल, सरकी तेल, पामतेल, सूर्यफूल तेलाच्या किमतीत प्रत्येकी दोन ते तीन रुपये कमी झाले असल्याचे तेल विक्रेते विनोद चौंडिये यांनी सांगितले. 

किराणा माल व त्याचे दर 

                   होलसेल                  किरकोळ दर 
शेंगदाणा       १०५ ते ११० रुपये       १२५ ते १३० 
साखर           ३६ ते ३७                 ३९ ते ४० 
मूगडाळ        १२० ते १२२              १३० 
चणाडाळ       ५५ ते ६०                ७० ते ७२ 
तूरडाळ         ८१ ते ८३                 ९५ 
मसूरडाळ      ७२                         ८०

डाळींचा तुटवडा नाही 

किराणासह तूर, मूग, हरभरा आणि मसूरडाळींचा पुरवठा आठवडाभरात कमी झाला होता. परराज्यांतील दाल मिल बंद असल्याने व सीमाबंदी असल्याने डाळींचा तुटवडा जाणवला; मात्र आता डाळींचा पुरवठा होत असल्यामुळे सध्या कुठलाही तुटवडा नसल्याचे किराणा मालाचे होलसेल विक्रेते नीलेश सेठी यांनी सांगितले.

असे आहेत तेलाचे दर 

  • सोयाबीन तेल - ९६ ते १०० रुपये किलो 
  • सरकी तेल - ९४ ते ९६ 
  • पामतेल - ८९ ते ९२ रुपये 
  • सूर्यफूल तेल - १०० ते १०४ रुपये 
  • शेंगदाणा तेल - १२० रुपये किलो 
  • करडी तेल - १५० रुपये किलो 

शहरात किराणा तेल व कोणत्याही गोष्टीचा सध्या तुटवडा नाही. दोन दिवसांपूर्वी याविषयी जिल्हा व्यापारी महासंघ व मॉलच्या काही अधिकाऱ्यांसोबत अपर विभागीय आयुक्त श्री. फड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात दीड महिना पुरेल इतका साठा आमच्याकडे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यासह आम्ही काही मॉलला भेटी दिल्या असता त्यांच्या स्टोरेजमध्येही दीड महिना पुरेल एवढा साठा आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये गहू, तांदळाचे वाटप सुरू झाले आहे. 
- महादेव किरवले, जिल्हा पुरवठा अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT