HSC Result 2021 Google
छत्रपती संभाजीनगर

बारावीत औरंगाबादमधील 99.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

संदीप लांडगे

यंदा जिल्ह्याचा निकाल ९९.५३ टक्के इतका लागला. विभागातून बारावीच्या निकालात औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी (ता.तीन) दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील ९९.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा रद्द केल्यामुळे दहावी, अकरावी व बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार व दहावीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथमसत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण, तसेच तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे बारावीसाठी भारांशनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले.

सदर गुणदान विचारात घेऊन मंडळाने विहीत कार्यपद्धतीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे. यंदा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी ५३ हजार ४४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात ३० हजार ७८६ मुले; तर २२ हजार ३२२ मुली होत्या. त्यापैकी ५३ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ३०,७६५ मुले आणि २२,३१३ मुली उत्तीर्ण झाल्या; तर २५१ विद्यार्थी नापास झाले आहेत. यंदा जिल्ह्याचा निकाल ९९.५३ टक्के इतका लागला. विभागातून बारावीच्या निकालात औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.

विद्यार्थ्यांना निकालाबाबत तक्रार करण्याची संधी

अनेक गुणवंतांनी दहावीच्या निकालानंतर नाराजी व्यक्त केली होती. ही बाब लक्षात घेता बोर्डाने बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुविधा उपलब्ध केली आहे. तक्रार निवारण अधिकारी म्हणून संबंधित विभागीय मंडळातील सहसचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यपद्धतीचा तपशील हा मंडळाच्या अधिकृत वेबसाइटर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT