Ramesh Pokale 
छत्रपती संभाजीनगर

सिद्धेश्‍वर मुंडेंना २ हजार ५२५ मते, रमेश पोकळेंना ३ हजार ५०० मते; पहिल्या फेरीत बोराळकरांना फटका

गणेश पिटेकर

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची पहिली फेरी गुरूवारी (ता.तीन) रात्री साडेआठला पूर्ण झाली आहे. यात अपक्ष उमेदवार सिद्धेश्‍वर मुंडेंनी २ हजार ५२५ मते, तर भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या रमेश पोकळे यांनी तीन हजार ५०० मते मिळावली आहेत. या दोघा अपक्षांचा फटका भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना बसल्याचे पहिल्या फेरीत स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे.
पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८५० मते, तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांना ११ हजार ५५८ मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीत वैध ५० हजार ६२० मते, तर अवैध ५ हजार ३८१ मते ठरली आहेत. तत्पूर्वी पहिल्या फेरीच्या ट्रेंडमध्ये सतीश चव्हाण हे आघाडीवर दिसत होते. हा ट्रेंड खरा झाल्याचे दिसत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतपत्रिकेवर काही मतदारांनी मराठा आरक्षणाविषयी लिहिले. दुसरीकडे काहींनी मोबाईल नंबर तर काहींनी गंमतीशरपणे स्वतःचे नावे लिहिल्याचे प्रकारसमोर आले आहेत. ही सर्व मते बाद होणार आहेत. एकूण एक हजार २६० पोस्टल मते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT