0jayakwadi_20dharan1
0jayakwadi_20dharan1 
छत्रपती संभाजीनगर

जायकवाडी धरणातून विसर्ग बंद, गोदावरी पात्रात एकतीस दिवस सोडले पाणी

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण येथील जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या काळात १०२ टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातून ६० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.


ता. पाच सप्टेंबर २०२० पासून जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. यंदा धरणाच्या स्थानिक मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे या पावसाच्या पाण्यावरच धरण सत्तर टक्के भरले. यानंतर नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टी झाल्याने जायकवाडी धरणावरील सर्व धरणे तुडुंब भरून वाहिली. या एकूण २६ धरणांचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले.

त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढून धरण शंभर टक्के भरल्यामुळे जायकवाडी धरण प्रशासनाने पहिल्या टप्प्यात धरणाचे सोळा दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. यानंतर पावसाचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे धरणाने धोक्याची पाणीपातळी ओलांडली असता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी दरवाजाच्या संख्येत वाढ करून पाणी सोडले.

शेवटी पाऊस थांबण्याचे नाव घेईना. त्यामुळे धरणाचे ता. २० सप्टेंबर २०२० रोजी सर्व २७ वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहिले. यानंतर पुन्हा पाण्याचा अंदाज घेऊन दरवाजांची संख्या कमी करण्यात आली; परंतु नंतर पुन्हा झालेल्या पावसामुळे धरणात पाणी येण्याची आवक वाढल्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा २७ दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, आता पाणीपातळी स्थिर असून आवक कमी झाल्यामुळे धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, कुलगुरु येवले यांचे आवाहन

वित्त व जीवित हानी नाही
दरम्यान, जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यापूर्वी पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने खबरदारी घेतली व गोदाकाठच्या गावांना उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे पाणी सोडल्याच्या काळात वित्त व जीवित हानी झाली नाही. नागरिकांनीही सावधानता बाळगली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT