छत्रपती संभाजीनगर

गंभीर अवस्थेतील रुग्ण हसल्याचे पाहून वैद्यकीय अधीक्षकांना अश्रू अनावर

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : रूग्णाकडून सर्दी, ताप, खोकला हे किरकोळ कारण समजून अंगावर काढून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रकृती गंभीर बनत चालली असून अशा चिंतीत रूग्णाचीच भरती उपजिल्हा रूग्णालयात होत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून एका उच्च मधुमेह व रक्तदाब असलेल्या रूग्णावर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यास प्रतिसाद देत गंभीर अवस्थेतील रूग्ण डॉक्टरांना पाहून हसला अन्..वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप सौंदळे यांना अश्रू अनावर झाले.

सध्या येथील उपजिल्हा रूग्णालयात साठ खाटांवर कोरोना संक्रमित रूग्णांवर उपचार केले जात आहेत. ज्या रूग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व स्कोअर अधिक झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही म्हणून पूढील उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवले जाते. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपर्यंत अशा रूग्णांवर उपचार केले जाते. शिवाय गंभीर झालेले रूग्ण भरती होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे नातेवाईक चिंतित होत आहे. येथे दोन विभाग तयार करण्यात आले असून जवळपास ७९ गंभीर रूग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णासाठी स्वतः वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे चार-पाच वेळा राउंड करीत असतात रूग्णाची तपासणी करीत असताना येथे उच्च मधुमेह व रक्तदाब असलेल्या कोरोना संक्रमित रूग्णावर गेल्या नऊ दिवसांपासून उपचार सुरू आसतांना डॉक्टरकडून ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

गंभीर रूग्ण वाचावे म्हणून डॉक्टरांची टीमही झटत असते. मात्र नऊ दिवसांपासून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रूग्ण जेव्हा डॉक्टरकडे पाहून हसला तेव्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे यांना अश्रू अनावर झाले अन् आता रूग्ण वाचणार असा अत्मविश्वास त्यांना आला. रूग्णाकडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत गेला तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांला हुरूप येतो. शर्थीचे प्रयत्न करून रूग्ण हातात येत नसेल तर मनाला फार वाईट वाटते. कधी कधी रात्र रात्र झोप येत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक दिलीप सौंदळे हे रूग्णाचा अनुभव सांगताना भावूक झाले होते. शिवाय सध्या येथील उपजिल्हा रूग्णालयात क्षमता कमी व रूग्ण आधिक अशी स्थिती झाली असून कर्मचारी कमी पडत आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनी आम्हालाही समजून घेतले पाहिजे रूग्णाच्या उपचारासाठी वेळ देणे महत्त्वाचा आहे. मात्र नातेवाईकांच्या प्रश्नांच्या भडीमारात वेळ जात आहे. हा संसर्ग तीव्र असून शासनाने जाहीर केलेले नियम नागरिकांनी पाळावे. कोणताही आजार साधा समजून अंगावर काढू नये. रूग्ण गंभीर आहेत. शेवटी आम्हीही माणसंच आहोत अशी भावनिकता त्यांनी व्यक्त केली.

सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असून गावागावात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. शासनाकडून संचारबंदी जाहीर केली असली तरी नागरिकांना याचे फारसे गांभीर्य दिसत नसून मागील वर्षी विषाणूची तीव्रता कमी असताना व केवळ ज्येष्ठ नागरिकच संक्रमित होत होते. त्यावेळी कडक शिस्त पाळली. यावेळी विषाणूची तीव्रता अधिक असताना व तरूण, मध्यम विळख्यात सापडत आहेत. शिवाय रूग्णही लगेच गंभीर होत आहेत. सर्दी, ताप, खोकला अंगावर काढणे जीवावर बेतले जात आहे. प्रारंभी लक्षणे दिसल्यानंतर प्रथमोपचार करणे गरजेचे आहे. काही रूग्णालयात प्राथमिक उपचार करून रूग्ण गंभीर झाल्यानंतर येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवले जात आहे. त्यामुळे तेथील डॉक्टरांना गंभीर झालेल्या रूग्णास वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT