Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

त्यांनी लिहून ठेवली मृत्यूची वेळ आणि धर्मग्रंथ वाचत संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद : कोरोनाच्या भास आणि भीतीमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. कित्येकांना मानसोपचारांची गरज पडत आहे. अशीच एक घटना औरंगाबाद जवळील मिटमिटा भागात घडली. 

यात्रा कंपनी चालवणाऱ्या व्यक्तीने कोरोनाच्या धास्तीने घरातच देवासमोर धार्मिक ग्रंथ वाचत इहलोकीची यात्रा संपवली. ही घटना शनिवारी (ता. २८) मध्यरात्री उघडकीस आली. 

अब्दीमंडी (ता.औरंगाबाद) येथील मूळ रहिवासी असलेले सोमनाथ आप्पा हरी आप्पा चौधरी (वय 68) सध्या मिटमिटा येथे राहत होते. वीस ते पंचवीस वर्षापासून ते चौधरी यात्रा कंपनीच्या माध्यमातून चारधाम यात्रेचे आयोजन करत असत. त्यामुळे त्यांचा मिटमिटा, दौलताबाद परिसरात व विविध राज्यांत दांडगा जनसंपर्क होता. 

तसेच येथील हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे होलसेल किराणा दुकानही होते. त्यांना एक भाऊ, पत्नी, मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवारही आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल का उचलले असावे, याबद्दल सर्वत्र चर्चा आणि कुतुहल व्यक्त होत आहे. 

टीव्हीवर कोरोना या आजाराविषयी येत असलेल्या बातम्या आणि घटना पाहून त्यांची मनस्थिती अशी झाली, की त्यांनी स्वतःच्या हाताने आत्महत्येची वेळ पांढऱ्या खडूने भिंतीवर लिहून ठेवली होती

आपल्या राहत्या घरात बाल्कनीत असलेल्या शिवमंदिरात त्यांनी शनिवारी धार्मिक ग्रंथाचे पठण सुरू केले. पण मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास त्यांनी बाल्कनीतील देवघरातच लोखंडी अँगलला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब आज रविवारी (ता, 29) सकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली. 

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT