राजू शेट्टी  sakal
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील बंद कारखान्यांबाबत सरकार उदासीन : राजू शेट्टी

बंद कारखाने सुरू करण्यासाठी लवकरच साखर आयुक्तांची भेट घेणार

पांडुरंग उगले

माजलगाव : मराठवाड्यातील अनेक साखर कारखाने बंद असून ते सुरू करण्याबाबत सरकार उदासीन आहे. बंद कारखान्यांमुळेच मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी अनेक कारखान्यांची क्षमता वाढलेली असल्याने हा प्रश्न निर्माण होणार नाही. एकरकमी एफआरपी देण्यासाठी मराठवाड्यातील कारखानदार, शेतकऱ्यांना अतिरिक्त उसाची भीती घालत असले तरी आम्ही ती घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

माजलगाव येथे रयत सोसायटीला सदिच्छा भेट दिली असता राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते. त्यांच्यासोबत अमोल हिप्परगे, कुलदीप करपे, अमित नाटकर उपस्थित होते. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली नाही तर वेळप्रसंगी साखर कारखान्यांना जाणारा ऊस रोखण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बंद कारखाने सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला; परंतु दुर्दैवाने मराठवाड्यातील बंद कारखाने सुरू करण्यासाठी कारखानदारांसह सरकारही प्रयत्न करीत नाही.

शेतकऱ्यांचे हे कारखाने सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांची भेट घेणार आहोत. बंद कारखाने ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांना सुरू करायला जमत नसेल तर, ते भाड्याने देण्याबाबत स्वाभिमानी संघटना आग्रही आहे असेही ते म्हणाले.

जयंत पाटील, बाळासाहेब पाटलांमुळे आंदोलन चिघळले

एकरकमी एफआरपीच्या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांमुळेच चिघळले आहे. अजूनही वेळ गेलेली नसून एकरकमी एफआरपी जाहीर करावी अन्यथा यापेक्षाही मोठा भडका उडेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT